spot_img
देशभारत- पाक सीमेवर छत्रपतींचा अश्वारूढ पुतळा ! मुख्यमंत्री शिंदेंनी केले अनावरण, पुतळ्याची...

भारत- पाक सीमेवर छत्रपतींचा अश्वारूढ पुतळा ! मुख्यमंत्री शिंदेंनी केले अनावरण, पुतळ्याची वैशिष्ट्ये काय? पहा..

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री : काश्मिरमधील कुपवाडा येथील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण झाले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, की हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना प्रेरणादायी ठरेल. तसेच छत्रपतींचा हा पुतळा आपल्या देशाचा तिरंगा ध्वज शत्रूच्या छातीवर फडकवण्यासाठी नेहमीच जवानांना प्रेरणा देईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

आम्ही पुणेकर संस्था, ४१ राष्ट्रीय रायफल्स मराठा बटालियनच्या माध्यमातून कुपवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला आहे. त्याचे उद्घाटन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी राज्याचे डेप्युटी गव्हर्नर मनोज सिन्हा, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आम्ही पुणेकर संस्थेचे विश्वस्त अभयसिंह शिरोळे, हेमंत जाधव आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांनी भाषणाची सुरूवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने केली. समोरच्या पर्वंतरांगापलिकडे असलेल्या पाकिस्तामनध्ये हा जयघोष पोहोचला पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले, अश्वारुढ पुतळ्यावरील छत्रपती शिवाजी महाराज पाकिस्तानच्या दिशेने बघत आहेत. त्यांच्या हातात तलवार आहे. महाराज येथे असल्याने शत्रू येथे पाऊल ठेवण्यास धजावणार नाही. हा पुतळा पाहून दहशतवादीही काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याची हिंमत करणार नाही. ज्या ठिकाणी हा पुतळा बसवला आहे त्या ठिकाणी काही दिवसांपूर्वी मोठा खड्डा पडला होता.

तेव्हा जवानांनी सुमारे १८०० ट्रक माती भरून त्याठिकाणी पुतळ्यासाठी भक्कम पाया करण्यात आला. याचा उल्लेख करून मुख्यमंत्र्यांनी मराठा बटालियनच्या जवानांचे कौतुक केले. सातारा येथील मेजर संतोष महाडीक यांना अभिवादन करीत त्यांच्या बलिदानाची आठवण यावेळी त्यांनी सांगितली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्त राज्य शासन आणि सांस्कृतिक विभागाने विविध उपक्रम राबवले. याच कालावधीत कुपवाड्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला याला मोठे महत्व आहे.

याठिकाणी स्मारक करण्यात येत आहे. त्यासाठी आवश्यक ते सहकार्य राज्य शासन करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे भारतात आणण्याचा करार करण्यात आला असून ही अभिमानाची बाब आहे. वाघनखे राज्यात आणल्यानंतर ठिकठिकाणी दर्शनासाठी ठेवली जातील, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीरमधील कलम ३७० हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. त्यानंतर आता

काश्मीरच्या विकासाचा नवा अध्याय सुरू झाला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली नायब राज्यपाल श्री. सिन्हा यांनी गेल्या महिन्यात काश्मिर येथे जी २० परिषद घेतली, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले. कुपवाडा येथे असलेले हे स्मारक जम्मू-काश्मीरला भेट देणाऱ्या देशातील लोकांसाठी एक प्रेरणास्थान बनेल. आपल्या सर्वांसाठी प्रेरणास्रोत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला आहे. हे स्मारक महाराष्ट्र आणि काश्मीरमधील संबंध अधिक दृढ करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मनपाची प्रभाग रचना, आरक्षण जाहीर करण्यास विलंब का? ; मनमानी पद्धतीने प्रभागांची तोडफोड करू देणार नाही

  शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांचा इशारा अहिल्यानगर / नगर सह्याद्री- अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील बहुतांश...

आरक्षण सोडतीने पारनेरचे राजकारण तापले; महाविकास आघाडी आणि महायुतीत चुरस

गणेश जगदाळे | नगर सह्याद्री पारनेर तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी...

निघोज जिल्हा परिषद व पंचायत समिती गटात चुरशीची निवडणूक रंगण्याचे संकेत

आरक्षण जाहीर; निवडणुकीचे ढोल वाजायला सुरुवात, दिवाळीमध्येच प्रचाराचा धडाका निघोज । नगर सहयाद्री:- निघोज जिल्हा...

मनपा निवडणूक मॅनेज करण्याकरिता हस्तक्षेप; ‘यांनी’ केली निवडणूक आयोगाकडे तक्रार

अंतिम प्रभाग रचना जाहीर न झाल्याने ठाकरे शिवसेनेची राज्य निवडणूक आयोगाकडे क्रार अहिल्यानगर | नगर...