spot_img
ब्रेकिंगएकनाथ शिंदेंचं महाविकास आघाडीला थेट आव्हान!; तुम्ही अडीच वर्षांत काय केलं? समोरासमोर...

एकनाथ शिंदेंचं महाविकास आघाडीला थेट आव्हान!; तुम्ही अडीच वर्षांत काय केलं? समोरासमोर येऊन चर्चा करा…

spot_img

नेवासा / नगर सह्याद्री –
राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. २० नोव्हेंबर रोजी मतदान आणि २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी मुख्य लढत पाहायला मिळत असून सध्या विविध मतदारसंघात दिग्गज नेत्यांच्या प्रचार सभा पार पडत आहेत. या सभेच्या माध्यमातून आपल्या उमेदवारांना निवडून देण्यासाठी नेत्यांकडून जनतेला आवाहन करण्यात येत आहे. याबरोबरच प्रचारसभांमधून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय टीका टीप्पणी आणि आरोप-प्रत्यारोपही सुरु आहेत.

मुख्यमंत्री शिंदेंचं मविआला थेट आव्हान
अशातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला थेट समोरासमोर येऊन चर्चा करण्याचं आव्हान दिलं आहे. वैजापूरमध्ये रमेश बोरनारे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलताना त्यांनी यासंदर्भात भाष्य केलं. “महाविकास आघाडीने अडीच वर्षात काय केलं, आणि आम्ही काय केलं. याची खुली चर्चा करायला मी तयार आहे. मात्र, विरोधक हे आव्हान स्वीकारायला नाही. कारण त्यांनी अडीच वर्षांत काहीही केलं नाही”, अशी टीका त्यांनी केली.

“राज्यात अडीच वर्ष स्थगिती सरकार होतं”
पुढे बोलताना त्यांनी विरोधकांवर जोरदार टीकास्र सोडलं. “महाविकास आघाडीच्या सरकारने अडीच वर्षांत अनेक विकास प्रकल्पांना स्थगिती दिली. राज्यात अडीच वर्ष स्थगिती सरकार होतं. त्यावेळी मंदिरं इतर प्रार्थनास्थळेही बंद केली होती. मात्र, महायुतीचं सरकार आलं आणि आपण राज्यातील सगळी मंदिरं उघडली. तसेच स्थगिती मिळालेल्या सगळ्या योजना पुन्हा सुरु केल्या”, असे ते म्हणाले.

“महाविकास आघाडीने आमचा वचननामा चोरला”
दरम्यान, मुख्यमंत्री शिंदेंनी जाहीरनाम्याच्या मुद्द्यावरूनही महाविकास आघाडीला लक्ष्य केलं. “महाविकास आघाडीने आमचा वचननामा चोरून त्यांचा जाहीरनामा प्रकाशित केला आहे. कॉपी पेस्ट करून जाहीरनामा बनवता येत नाही, हे त्यांना माहिती नाही”, अशी टीका त्यांनी केली.

“महायुतीचा जाहीरनामा म्हणजे फक्त ट्रेलर”
“महायुतीचा जाहीरनामा म्हणजे फक्त ट्रेलर आहे. संपूर्ण सीनेमा अजून यायचा बाकी आहे. आम्ही लाडकी बहीण योजनेत महिलांना १५०० वरून २१०० रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही शेतकरी सन्मान योजनेचा निधीदेखील वाढवला आहे. प्रत्येकाच्या मुलभूत गरजा भागवण्यासाठी सरकारने प्रयत्न केले आहेत”, असेही त्यांनी सांगितलं.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पावसामुळे नुकसान झालेल्या केडगाव अमरधाम, आंबेडकर भवनाची आयुक्तांकडून पाहणी

पडलेल्या भिंती बांधण्याचे काम तत्काळ सुरू करा : आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे अहिल्यानगर ।...

मनपा, झेडपी निवडणुकांसाठी रणशिंग फुंकले!, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेनेकडून जोर बैठका..

सुनील चोभे | नगर सह्याद्री आगामी दोन-तीन महिन्यांत होऊ घातलेल्या महापालिका, नगर पंचायती, नगर परिषदा,...

ठाकरे ब्रँड बुडाला! आदित्य ठाकरेंचा पावसाळा आता कारागृहात?; मंत्री नितेश राणेंचे खळबळजनक वक्तव्य…

Politics News: राज्याचे मंत्री आणि भाजप नेते नितेश राणे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून...

शहरासह जिल्ह्यात बकरी ईद उत्साहात साजरी; शांतता व सामाजिक सलोख्यासाठी प्रार्थना

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शहरासह जिल्ह्यात मुस्लिम समाज बांधवांनी बकरी ईद (ईद उल अजहा) शनिवारी...