spot_img
ब्रेकिंगमहाराष्ट्रात भूकंपाचे हादरे; राज्यात कुठे कुठे बसले धक्के पहा...

महाराष्ट्रात भूकंपाचे हादरे; राज्यात कुठे कुठे बसले धक्के पहा…

spot_img

मुंबई | नगर सह्याद्री
मराठवाड्यासह विदर्भातील वाशिम जिल्ह्याला सकाळीच भूकंपाने हादरवले. त्यामुळे नागरीक भयभीत झाले. अनेकांनी खुल्या जागांकडे धाव घेतली. हिंगोली, परभणी, नांदेडसह वाशिम जिल्ह्याला भूकंपाचे धक्के जाणवले. सकाळी ०७:१४ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपची तीव्रता रिश्टर स्केल वर ४.५ नोंदविण्यात आलेली आहे. प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. सकाळीच प्रशासकीय यंत्रणेने या भूकंपाची तीव्रता आणि कुठे हानी झाली का याचा आढावा घेतला आहे. नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

सकाळी नांदेड परभणी हिंगोली या जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. सकाळी ७.१४ वाजता भूकंपाचा धक्का जाणवला. नांदेड मध्ये भूकंपाची ४ पूर्णांक ०५ अशी रिस्टर स्केलवर नोंद झाली आहे. या धयांने नागरिक भयभीत झाले असून घराबाहेर आले आहेत.

विदर्भातील वाशिम जिल्ह्यासह हिंगोली, परभणी, नांदेड, छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यातील काही भागातही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. पैठण तालुयातील पाचोड येथे सकाळी ७:१५ मिनीटाला धक्के जाणवले. जालना जिल्ह्यातील अंबड तालुयातही भूंकपाचे धक्के जाणवले. परभणी शहर, सेलू, गंगाखेड, हिंगोलीतील पिंपळदरी, राजदरी, वसमत भागाला सकाळीच भूकंपाचे धक्के जाणवले. २ महिन्यांपूर्वी सुद्धा या भागात भूकंपाचे धक्के जाणवले होते. वसमत तालुयातील पांगरा शिंदे आणि आजूबाजूच्या भागात जमिनीतून गूढ आवाज येत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली होती. तर रामेश्वर तांडा भागतही भूंकपाचे हादरे बसले होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...