spot_img
अहमदनगर'डॉ. विखे पाटील फाउंडेशनच्या परिचर्या महाविद्यालयात राष्ट्रीय परिषद'

‘डॉ. विखे पाटील फाउंडेशनच्या परिचर्या महाविद्यालयात राष्ट्रीय परिषद’

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री
डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या परिचर्या महाविद्यालयात ८ ऑक्टोबर २०२४ रोजी “बहुउद्देशीय न्यायवैद्यक परिचारिका: कायद्याची अंमलबजावणी आणि आरोग्य सेवा” या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले. या परिषदेचे प्रमुख अतिथी म्हणून राकेश ओला (पोलीस अधीक्षक, अहमदनगर) आणि वसंतराव कापरे (विश्वस्थ, डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन) उपस्थित होते.

महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. प्रतिभा अरुण चांदेकर यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले व परिषदेची प्रस्तावना सादर केली. या परिषदेत न्यायवैद्यक परिचारिका, पुरावे संकलन, पीडितांचे समुपदेशन आणि कुटुंबास आधार देण्याच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. विविध तज्ज्ञांनी आपल्या व्याख्यानांद्वारे फॉरेन्सिक नर्सिंग आणि न्यायवैद्यक शास्त्रावर सखोल माहिती दिली.

डॉ. जयदीपा आर. (प्राचार्य, आय.क्यू.टी.सी., पश्चिम बंगाल) यांनी पुरावे गोळा करण्यात परिचारिकांची भूमिका स्पष्ट केली. प्रा. डॉ. व्ही.डी. पंडारे (न्यू लॉ कॉलेज, अहमदनगर) यांनी सिव्हिल आणि क्रिमिनल कायद्यांवर विचार मांडले. तसेच, अनेक मान्यवरांनी विविध विषयांवर आपले विचार व्यक्त केले.

या परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाच्या विविध शिक्षक व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. परिषदेचा समारोप विजेत्यांना पारितोषिक देऊन करण्यात आला. परिषदेत २५८ प्रत्यक्ष आणि ११० ऑनलाइन विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...