spot_img
ब्रेकिंगराज्यावर हवामानाचे दुहेरी संकट! अनेक जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटा तर 'या' जिल्ह्यांना पावसाचा...

राज्यावर हवामानाचे दुहेरी संकट! अनेक जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटा तर ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

spot_img

पुणे | नगर सह्याद्री
राज्याला सध्या दुहेरी हवामाच्या संकटाचा सामना करावा लागणार आहे. राज्यात उष्णतेत कमालीची वाढ झाली असून अंगाची लाहीलाही होत असताना हवामान विभागाने उष्णतेची लाट वाढणार असल्याचा इशारा दिला आहे. एवढंच नाही तर राज्यातील काही भागामध्ये अवकाळी पावासाचा अलर्ट हवामान खात्याच्या वतीने देण्यात आला आहे.

राज्यात उन्हाचा तीव्र चटका बसत असून शुक्रवारी (दि.५) रोजी सोलापूर जिल्हात सर्वांत जास्त उच्चांकी कमाल तापमान ४३.९ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे. विदर्भ व मराठवाड्यात उच्चांकी तापमानाची नोंद होऊ लागली आहे. दरम्यान, पुढील चार दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस व गारपिटीचा, तसेच विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे

.हवामान विभागाच्या माहितीनुसार, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पुढील दोन ते तीन दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. विदर्भातील यवतमाळ, अकोला, चंद्रपुरात पुढील तीन दिवस उष्णतेची लाट असेल त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, शुक्रवारी सोलापूर जिल्हा देशभरात सर्वाधिक तापमान असणार्‍या शहरांच्या यादीत नोंद झाली आहे.

वातावरणात बदल?
रविवारपासून अरबी समुद्रावरूनही बाष्पयुक्त वारे येण्याचा अंदाज आहे. या वार्‍यामुळे विदर्भात रविवारी आणि सोमवारी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच पूर्व विदर्भापासून, कर्नाटक, तमिळनाडू ते कोमोरिन भागापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. राज्यात सध्या ढगाळ आकाश होत असून, उन्हाच्या झळा, उकाडा कायम आहे. रात्री उष्ण ठरत असून, पावसाला पोषक हवामान होत आहे.

कालचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
पुणे ३९.६, अहमदनगर ३८.८, जळगाव ३७.९, धाराशीव ४०.६, छत्रपती संभाजीनगर ३९.४, कोल्हापूर ४०.२, महाबळेश्वर ३३.६, मालेगाव ४०.८, नाशिक ३७.२, सांगली ४१, सातारा ३९.७, सोलापूर ४३.१, मुंबई ३२.५ ,अलीबाग ३४.१, परभणी ४१.४ , बीड ४१.५, अकोला ४१.८, अमरावती ४०.६, बुलडाणा ३७.५, ब्रह्मपुरी ४२, चंद्रपूर ४२.४, गोंदिया ४०.३, नागपूर ४१.४, वर्धा ४२.१, यवतमाळ ४२. रत्नागिरी ३३.५, डहाणू ३५.५

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मुख्याध्यापक लंके यांची बदली रद्द करा; रयतच्या कार्यालयासमोर पालकांचे धरणे आंदोलन

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक विभागाचे कार्यरत मुख्याध्यापक...

उद्धव-राज एकत्र येणार; पाच जुलैला मुंबईत..

मुंबई । नगर सहयाद्री  महाराष्ट्रातील विरोधी पक्षांचा आक्रमक पवित्रा पाहून देवेंद्र फडणवीस सरकारने हिंदी सक्तीचा...

जामखेडमध्ये धक्कादायक प्रकार! पुन्हा एका बालकाचा मृत्यू; आठ दिवसांतील तिसरी घटना..

जामखेड । नगर सहयाद्री:- क्रिकेट खेळताना स्लॅबवरती गेलेला बॉल फ्लेसच्या लोखंडी पाईपने काढत असताना घरावरील...

अधिवेशनात गदारोळ! काँग्रेसचे आमदार नाना पटोले निलंबित; कारण काय?

मुंबई । नगर सहयाद्री पावसाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी मोठा गोंधळ पाहायला मिळाला. काँग्रेसचे आमदार...