spot_img
आरोग्यHealth Tips: मानदुखीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका! अन्यथा उद्भवू शकतात 'या' समस्या?

Health Tips: मानदुखीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका! अन्यथा उद्भवू शकतात ‘या’ समस्या?

spot_img

नगर सह्याद्री टीम-
सकाळी उठल्यानंतर अनेकदा मान दुखू लागते. त्यामुळे दिवसभर वेदना जाणवू लागतात. बदललेल्या जीवनशैलीनुसार कामाची व्याप्ती वाढली आहे. यामुळे आपण आरोग्याकडे लक्ष देऊ शकत नाही. ऑफिस किंवा घरी बसताना आपण चुकीच्या पद्धतीने बसतो. झोपताना, उशीवर किंवा उंचावर डोके ठेवतो. यामुळे मानेमध्ये वेदना होतात. लहान वयातच मानदुखीची समस्या गंभीर बनते. जास्त वेळ बसणे, स्नायूंचा ताण किंवा चुकीच्या पद्धतीने झोपणे यामुळे या समस्या उद्भवू शकतात.

पण औषध घेतल्यानंतर काही वेळाने बरे वाटते. पण जर तुम्हाला वेदना होत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. वारंवार मान दुखणे हे घशाच्या किंवा डोक्याच्या कर्करोगाचे लक्षण असू शकतात.

1. मान आणि डोक्याच्या कर्करोगाची लक्षणे कोणती?

घसा खवखवणे

डोकेदुखी

मानेचे दुखणे

श्वास घेण्यास किंवा बोलण्यात अडचण

तोंडात किंवा जिभेवर सतत फोड येणे

मान सूजणे

नाक्तातून रक्त येणे

कान दुखणे

2. मान दुखीचे कारण काय?

1. तंबाखूचे सेवन

तंबाखू हे घशाच्या कर्करोगाचे सर्वात सर्वात मोठे कारण आहे. याच्या सेवनाने घशाचा आणि डोक्याचा कर्करोग होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे कोणत्याही प्रकारे तंबाखूचे सेवन करू नये.

2. घातक रसायनांचा संपर्क –

जर आपण पेंट, लाकूड धूळ इत्यादींच्या वासाच्या संपर्कात जास्त वेळ घालवला तर यामुळे घसा आणि डोक्याचा कर्करोग होऊ शकतो. त्यामुळे अशी रसायने टाळण्याचा प्रयत्न करा.

3. तोंडाची स्वच्छता-

तोंडाच्या आरोग्याची काळजी न घेतल्याने मान आणि डोक्याच्या कर्करोगाचा धोका वाढतो. त्यामुळे तोंडाच्या स्वच्छतेची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ब्रेकिंग : माजी आमदार विजय औटी यांचा मोठा निर्णय, केली भूमिका जाहीर

पारनेर | नगर सह्याद्री माजी आमदार व शिवसेनेचे उबाठा गटाचे ज्येष्ठ नेते विजय औटी यांनी...

खंडणीसाठी जीवे मारण्याचा प्रयत्न! आरोपीला ठोकल्या बेड्या, पहा काय घडला प्रकार…

जामखेड / नगर सह्याद्री : मी जामखेडचा भाई आहे, तुला दुकान चालवायचे असेल तर मला...

विरोधकांकडून आरोप करून निवडणूकीत प्रसिद्धी मिळवण्याचे काम ; विखेंनी हाणला लंकेंना टोला

कर्जत । नगर सह्याद्री : ही देशाची निवडणूक असून देशाचा पंतप्रधान ठरविणारी निवडणूक आहे यामुळे...

पद्मश्रींच्या पुढच्या पिढीने काय केले? प्रश्नावर विखेंनी घेतला पवारांचा समाचार

अहमदनगर / नगर सह्याद्री - पद्मश्रींच्या पुढच्या पिढीने काय केले? हे सांगण्यासाठी आज स्व. आप्पासाहेब...