spot_img
अहमदनगर'माजी सभापती भानुदास कोतकर यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्याचे वाटप'

‘माजी सभापती भानुदास कोतकर यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्याचे वाटप’

spot_img

अहमदनगर| नगर सह्याद्री
कृषी उत्पन्न बाजार समिती, पंचायत समितीचे माजी सभापती भानुदास कोतकर यांच्या वाढदिवसानिमित्त भानुदास कोतकर फाउंडेशनच्या वतीने केडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी बाजार समितीचे संचालक नीलेश सातपुते, माजी सभापती मनोज कोतकर, जालिंदर कोतकर, सुनील कोतकर, भूषण गुंड, अशोक कराळे, शिवा मोढवे, पोपट कराळे, गणेश कराळे, शेळके, राहुल कांबळे, वैभव गिरी, संजय गुंड, महेश कार्ले, आसीफ सय्यद, महेश झरेकर, ईश्वर नवसुपे आदी उपस्थित होते.

कृषी उत्पन्न बाजार समिती, पंचायत समितीचे माजी सभापती भानुदास कोतकर यांचा वाढदिवस केडगावमध्ये विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. सामाजिक भावनेतून कार्यरत असलेल्या भानुदास कोतकर फाउंडेशनने वाढदिवसाचे औचित्य साधून जिल्हा परिषदेच्या ११ शाळांमधील सुमारे १५०० शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वितरित केले.

यावेळी नीलेश सातपुते म्हणाले की, केडगावच्या विकासाची मुहूर्तमेढ भानुदास कोतकर यांनी रोवली. नेप्ती उपबाजार समितीच्या माध्यमातून नगरची ओळख राज्यभर झाली. बेरोजगारांना रोजगाराची संधी त्यांच्या माध्यमातून मिळाली. त्यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत भानुदास कोतकर फाऊंडेशनच्या वतीने केडगावमधील जि.प.शाळांमधील विद्यार्थ्यांची गरज ओळखून त्यांना शालेय साहित्य दिल्याचे ते म्हणाले.

मनोज कोतकर म्हणाले की, भानुदास कोतकर यांच्या मार्गदर्शनाखाली माजी महापौर संदीप कोतकर यांनी शहराचा व केडगावचा विकास केला. त्यांच्या काळातील कामे सर्वांना ज्ञात आहेत. सामाजिक, शैक्षणिक आदी क्षेत्रांत केडगावने आपले वेगळेपण कायम जपले आहे, असे ते म्हणाले. यावेळी जालिंदर कोतकर, शेळके, राहुल कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...