spot_img
देशकेजरीवाल यांच्या अटकेची चर्चा! ईडीच्या सुत्रांनी केला 'असा' दावा

केजरीवाल यांच्या अटकेची चर्चा! ईडीच्या सुत्रांनी केला ‘असा’ दावा

spot_img

नवी दिल्ली
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र ईडीच्या सुत्रांनी ‘सध्या तरी नाही’ असा दावा केला आहे. केजरीवाल यांच्या अटकेबाबत ईडीच्या सूत्रांनी दावा केला आहे की, सध्या त्यांना अटक करण्याची कोणतीही योजना नाही.

ईडी त्यांच्या पत्रांचे पुनरावलोकन करत आहे. त्यानंतर केजरीवाल यांना चौथे समन्स जारी केले जाऊ शकते. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित दारू घोटाळ्यात अटक होण्याची भीती असताना ईडी आता त्यांना चौथ्यांदा समन्स पाठवण्याची तयारी करत आहे.

अंमलबजावणी संचालनालयाशी (ईडी) संबंधित उच्च सूत्रांनी सांगितले, की सध्या केजरीवाल यांनी पाठवलेल्या पत्राचा आढावा घेतला जात आहे. यानंतर त्यांना चौथे समन्स पाठवले जाईल. ईडी आज केजरीवाल यांच्या निवासस्थानावर छापे टाकणार असल्याचा दावा हे अफवा असल्याचे म्हटले आहे.

केजरीवाल यांना ३ समन्स बजावून चौकशीसाठी ईडी कार्यालयात बोलावले होते. मात्र, केजरीवाल अद्याप ईडीसमोर हजर झाले नाहीत. आम आदमी पार्टीचा दावा आहे की, केजरीवाल यांना अटक करण्यासाठी ही प्रक्रिया केली जात आहे. ईडी त्यांना चौकशीच्या बहाण्याने बोलावून अटक करू इच्छित आहे.

जर ईडीला चौकशी करायची असेल तर ते आपले प्रश्न लिहून केजरीवाल यांना देऊ शकतात. बुधवारपासून आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी केजरीवाल यांच्या अटकेची भीती व्यक्त करण्यास सुरुवात केली. ईडी केजरीवाल यांच्या निवासस्थानावर छापा टाकून त्यांना अटक करू शकते, असा दावा आप नेत्यांनी केला होता.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राजकारणात खळबळ!, शरद पवार-अजित पवार आज एकत्र येणार?

मुंबई । नगर सहयाद्री:- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी काल...

नागरिकांनो सतर्क राहा! हवामान खात्याचा हादरवणारा रिपोर्ट; ‘या’ जिल्ह्यांना हाय अलर्ट?

Weather Update: राज्यातील तापमानात घट झाली असून उकाड्यातही दिलासा मिळाला आहे. आज मध्य महाराष्ट्र...

शरद पवारांच्या वक्तव्यावर मंत्री विखे पाटलांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले, ‘दोघं एकत्र आले तर…’

Politics News: दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चा राज्यात खूप रंगल्या असताना, गुरुवारी राज्याचे जलसंपदा...

आजचे राशी भविष्य! ‘मे’ महिन्यातील उत्तम दिन, ‘या’ राशीच्या जीवनात मोठे बदल घडणार

मुंबई। नगर सह्याद्री मेष राशी तुमचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यास लाभदायक दिवस. आर्थिक पक्ष मजबूत होण्याची...