spot_img
देशकेजरीवाल यांच्या अटकेची चर्चा! ईडीच्या सुत्रांनी केला 'असा' दावा

केजरीवाल यांच्या अटकेची चर्चा! ईडीच्या सुत्रांनी केला ‘असा’ दावा

spot_img

नवी दिल्ली
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र ईडीच्या सुत्रांनी ‘सध्या तरी नाही’ असा दावा केला आहे. केजरीवाल यांच्या अटकेबाबत ईडीच्या सूत्रांनी दावा केला आहे की, सध्या त्यांना अटक करण्याची कोणतीही योजना नाही.

ईडी त्यांच्या पत्रांचे पुनरावलोकन करत आहे. त्यानंतर केजरीवाल यांना चौथे समन्स जारी केले जाऊ शकते. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित दारू घोटाळ्यात अटक होण्याची भीती असताना ईडी आता त्यांना चौथ्यांदा समन्स पाठवण्याची तयारी करत आहे.

अंमलबजावणी संचालनालयाशी (ईडी) संबंधित उच्च सूत्रांनी सांगितले, की सध्या केजरीवाल यांनी पाठवलेल्या पत्राचा आढावा घेतला जात आहे. यानंतर त्यांना चौथे समन्स पाठवले जाईल. ईडी आज केजरीवाल यांच्या निवासस्थानावर छापे टाकणार असल्याचा दावा हे अफवा असल्याचे म्हटले आहे.

केजरीवाल यांना ३ समन्स बजावून चौकशीसाठी ईडी कार्यालयात बोलावले होते. मात्र, केजरीवाल अद्याप ईडीसमोर हजर झाले नाहीत. आम आदमी पार्टीचा दावा आहे की, केजरीवाल यांना अटक करण्यासाठी ही प्रक्रिया केली जात आहे. ईडी त्यांना चौकशीच्या बहाण्याने बोलावून अटक करू इच्छित आहे.

जर ईडीला चौकशी करायची असेल तर ते आपले प्रश्न लिहून केजरीवाल यांना देऊ शकतात. बुधवारपासून आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी केजरीवाल यांच्या अटकेची भीती व्यक्त करण्यास सुरुवात केली. ईडी केजरीवाल यांच्या निवासस्थानावर छापा टाकून त्यांना अटक करू शकते, असा दावा आप नेत्यांनी केला होता.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

भाजप-राष्ट्रवादीचं ठरलं!, महापालिका निवडणुकीत युती; एमआयएमही उतरणार मैदानात

अहिल्यानगर | नगर सह्याद्री महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाल्याने राजकीय हालचालींना आता...

नेपाळमध्ये राडा! आंदोलकांनी संसद पेटवली, पंतप्रधानांचा राजीनामा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - नेपाळमधील परिस्थिती सतत बिकट होत चालली आहे. निदर्शनांनी हिंसक...

चिचोंडी पाटील उपबाजार समितीचे शुक्रवारी भूमिपूजन; आमदार कर्डिले यांची माहिती, कोण कोण राहणार उपस्थिती?

अहिल्यानगर | नगर सह्याद्री नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील उपबाजार समितीचे भूमिपूजन येत्या शुक्रवार दिनांक 12...

विसर्जन मिरवणुकीत युवकाचा खून; कुठे घडली घटना?

सांगली । नगर सहयाद्री:- मिरज तालुक्यातील अंकली गावात गणेश विसर्जन मिरवणुकीत दोन गटांमध्ये सुरू...