spot_img
ब्रेकिंगलोकशाही पद्धतीने अडचणीत आणणार! लोकसभेसाठी मराठा समाजाचा नवा डाव?

लोकशाही पद्धतीने अडचणीत आणणार! लोकसभेसाठी मराठा समाजाचा नवा डाव?

spot_img

धारशिव। नगर सहयाद्री-
मराठा समाजाकडून मराठा समाजास ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केली जात आहे. त्यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन गेल्या काही महिन्यांपासून सुरु आहे. त्यानंतर महाराष्ट्र शासनाने मराठा समाजास स्वतंत्र दहा टक्के आरक्षण दिले. परंतु हा निर्णय मनोज जरांगे पाटील यांनी फेटाळला. दहा टक्के आरक्षण एकूण आरक्षणाच्या ५० टक्क्यांमध्ये देण्याची मागणी त्यांनी केली. आता या प्रकारानंतर लोकसभेसाठी नवीन रणनीती मराठा समाजाने तयार केली आहे. त्यात उमेदवार देण्याची तयारी सुरु केली आहे. तसेच निवडणूक ईव्हीएमवर घेण्यासाठी अडचण आणली जाणार आहे. मराठा समाजाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

मराठा समाजाने धाराशिव लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरु केली आहे. त्यासाठी प्रत्येक गावात एक उमेदवार उभा करण्याचा निर्धार केला आहे. तसेच भुम येथे बैठकांचे सत्र सुरु केले आहे. सावरगाव येथे बैठक घेऊन गावातून ३ उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मात्र निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे.

लोकसभा निवडणुकीत प्रशासनाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न लोकशाही पद्धतीने मराठा समाजाकडून होणार आहे. त्यासाठी धाराशिवमधून १ हजार उमेदवार उभे करणार आहे. ३८४ पेक्षा जास्त उमेदवार उभे राहिल्यास ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुक घ्यावी लागते. मराठा समाजाकडून मोठ्या संख्येने उमेदवार उभे केले गेल्यास धारशिवमध्ये प्रशासनाला वेगळीच तयारी करावी लागणार आहे.

एसआयटी चौकशीच्या विरोधात मोर्चा
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबाबत एसआयटी चौकशी करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले होते. त्याविरोधात परभणीत ११ मार्च रोजी सकल मराठा समाजाकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. परभणीत सकल मराठा समाजाकडून आयोजित बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगरमध्ये ग्राम महसुल अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात

  अहिल्यानगर/प्रतिनिधी : पारनेर तालुक्यातील वाडेगव्हाण (ता. नगर) येथील ग्राम महसुल अधिकारी दिपक साठे यास लाचलुचपत...

आता मराठ्यांचं वादळं दिल्लीत धडकणार, जरांगे पाटलांची थेट घोषणा, समोर आलं मोठं कारण

नगर सह्याद्री वेब टीम - मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज...

प्रवाशांनो लक्ष द्या! आता बीडहून अहिल्यानगरकडे रेल्वेगाडी धावणार; कुणाच्या हस्ते झाले उदघाटन?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अनेक दशकांपासून बीडवासीयांचे स्वप्न असलेली रेल्वे अखेर वास्तवात उतरली आहे....

आमदारांची ॲक्शन, पोलिसांची रिॲक्शन; रस्त्यावर गोमांस फेकणाऱ्या आरोपीला सहा तासात बेड्या

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शहरातील कोठला भागात मंगळवारी सायंकाळी रस्त्यावर गोमांस टाकल्याचे निदर्शनास आल्यावर...