spot_img
महाराष्ट्रलोकशाहीचे अधःपतन झाले ! राष्ट्रवादीसंबंधी निकालानंतर घटनातज्ञ उल्हास बापट यांची प्रतिक्रिया, वाचा..

लोकशाहीचे अधःपतन झाले ! राष्ट्रवादीसंबंधी निकालानंतर घटनातज्ञ उल्हास बापट यांची प्रतिक्रिया, वाचा..

spot_img

पुणे / नगर सह्याद्री : केंद्रीय निवडणूक आयोगाने काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवारांचा असल्याचे स्पष्ट केले. शिवसेनेची घटना व राष्ट्रवादीची घटना वेगळी आहे. परंतु निवडणूक आयोगाने बहुमत कोणाच्या बाजूने? हे पाहून निकाल दिला.

शरद पवार गट केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देईल हेही नक्की. केंद्रीय निवडणूक आयोगाने काल जो निकाल दिला, त्यावर आता घटनातज्ञ उल्हास बापट यांची प्रतिक्रिया आली आहे.

“कालच्या निकालामुळे लोकशाहीची अधःपतन झालं आहे. शिवाय घटनेची पायमल्ली झाली आहे. सुप्रीम कोर्टात निवडणूक आयोगाचा निर्णय रद्द झाला पाहिजे. शिवाय कोर्टाने पक्षांतरबंदी कायद्यात स्पष्टता आणली पाहिजे. ज्याच्याकडे बहुमत त्याच्या बाजूने निकाल देणे चुकीचे आहे” असं उल्हास बापट म्हणाले.

“कालच्या निकालाचा विधानसभा अध्यक्षांवर परिणाम होणार नाही, मात्र ते काय निकाल देतील ते आपल्याला माहिती आहे” असं उल्हास बापट म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मुख्यालयातील पोलीस अंमलदार झाले बेपत्ता

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- येथील पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले पोलीस अंमलदार बेपत्ता झाले आहेत....

नगरमधील तीन युवकांचा मृत्यू; तिरुपतीवरुन परत येतांना नेमकं काय घडलं?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री :- अहिल्यानगर जिल्हयातील शेवगाव येथील युवकांच्या अपघताचे वृत्त समोर आले...

आमदार संजय गायकवाडांचा राडा; कँटिन ऑपरेटरला लाथा-बुक्क्‌‍यांनी मारहाण, कारण काय?

मुंबई । नगर सहयाद्री वादग्रस्त वक्तव्यांमुळे सातत्याने चर्चेत राहणारे शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड...

प्रवरेला पूर; अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘या’ गावांचा संपर्क तुटला

संगमेनर । नगर सहयाद्री:- अकोले तालुक्यातील भंडारदरा व निळवंडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील घाटघर-रतनवाडी-हरिश्चंद्रगड-कुमशेत-साम्रद भागात...