spot_img
ब्रेकिंगलोकसभेची उमेदवारी उदयनराजे यांना मिळणार? उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आम्ही..

लोकसभेची उमेदवारी उदयनराजे यांना मिळणार? उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आम्ही..

spot_img

सातारा। नगर सहयाद्री-
निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. निवडणूक आयोगाकडूनही जय्यत तयारी सुरू असून लवकरच लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनीही जोरदार तयारी सुरू केली आहे. दरम्यान,आज रविवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उदयनराजेंची राहत्या घरी भेट घेतल्याने उदयनराजेंच्या उमेदवारीबाबत चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं आहे.

खासदार उदयनराजे भोसले यांचा नुकताच वाढदिवस संपन्न झाला. यापूर्वीही लोकसभेच्या उमेदवारीसाठी साताराचा उमेदवार म्हणून मीच असे संकेत त्यांनी काही दिवसांपूर्वी दिले होते. दरम्यान आज उदयनराजे यांच्या वाढदिवसानिम्मित उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पहिल्यांदा आम्ही जागावाटप करणार आहोत, जागावाटप झाल्यानंतर ती प्रोसेस होईल. त्यामुळे इतर पक्षांप्रमाणे घोषणा करणार नाही, प्रोसेसनुसार उमेदवारीची घोषणा होईल. आम्ही आता बसून कुणी कोणत्या जागा लढणार यासंदर्भात निर्णय करु. आमची चर्चेची पहिली फेरी झालेली आहे. या फेरीत बऱ्यापैकी प्रश्न सुटले आहे. आणखी दोन तीन फेऱ्या आम्हाला कराव्या लागतील, ज्यामध्ये सर्व प्रश्न सुटतील असेही ती यावेळी म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राखेतून फिनिक्ससारखी भरारी — माजी सैनिक नवनाथ खामकर यांचा संकल्प एस. मार्ट पुन्हा उभा

  श्रीगोंदा / नगर सह्याद्री - राखेतून पुन्हा जन्म घेणाऱ्या फिनिक्स पक्षासारखी किमया श्रीगोंद्यात पाहायला मिळाली...

स्थानिक स्वराज्य संस्थांनच्या निवडणुका संभाजी ब्रिगेड ताकदीने लढवणार – इंजी. शामभाऊ जरे

श्रीगोंदा / नगर सह्याद्री दिवाळीनंतर होणाऱ्या नगरपरिषद, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी संभाजी ब्रिगेड...

ओबीसी आरक्षण कमी झाल्याचा पुरावा आहे का? राधाकृष्ण विखे पाटील काय म्हणाले पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - ओबीसी आरक्षणावरून शुक्रवारपासून वातावरण पुन्हा तापले आहे. बीडमध्ये ओबीसी...

अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांना 846 कोटी 96 लाख रुपयांची मदत; पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

अहिल्यानगर | नगर सह्याद्री सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यातील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर...