spot_img
मनोरंजनगब्बरची भूमिका करणार होता डॅनी, शत्रुघ्न सिन्हा.. गाजलेल्या 'शोले' चित्रपटासंदर्भातील काही गमतीजमती..!

गब्बरची भूमिका करणार होता डॅनी, शत्रुघ्न सिन्हा.. गाजलेल्या ‘शोले’ चित्रपटासंदर्भातील काही गमतीजमती..!

spot_img

नगर सह्याद्री टीम : 1975 साली प्रदर्शित झालेला ‘शोले’ हा चित्रपट अमिताभ बच्चन यांच्या करिअरमधील मैलाचा दगड ठरला. या चित्रपटात अमिताभ व्यतिरिक्त धर्मेंद्र, हेमा मालिनी आणि अमजद खान मुख्य भूमिकेत दिसले होते. शोलेचे दिग्दर्शन रमेश सिप्पी यांनी केले होते. या चित्रपटात निगेटिव्ह भूमिका साकारणारा अमजद खान आजही त्याच्या अभिनयामुळे लक्षात राहतो, मात्र याआधी ही भूमिका अमजद नव्हे तर डॅनी डेंजोंगप्पा साकारणार होते.

अमिताभ बच्चन यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते, ‘मी आणि रमेश सिप्पी साहेब बंगळुरूला गेलो होतो. इथेच आम्ही ठरवले की हे चित्रीकरण करण्यासाठी सर्वोत्तम ठिकाण आहे. रमेश जी बऱ्याच दिवसांपासून शूटिंगच्या शोधात होते. पण जेव्हा हा निर्णय घेण्यात आला तेव्हा एकदा आम्ही आणि रमेश जी बंगलोरमध्ये होतो तेव्हा त्यांनी सांगितले की डॅनी हा चित्रपट करू शकणार नाही कारण त्यांना तारखांच्या बाबतीत काही समस्या आहे.

अमिताभ पुढे म्हणाले, ‘यानंतर अमजद खान साहेबांना कास्ट करण्यात आले तेव्हा त्यातही खूप चर्चा झाली. पण चित्रपट केल्यानंतर मला कळाले की माझ्या आधी शत्रुघ्न सिन्हा यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, त्याने चित्रपट सोडण्यामागचे मुख्य कारण अद्याप मला समजलेले नाही.

अमजद खान यांना भूमिका कशी मिळाली? चित्रपटाचे लेखक सलीम खान म्हणाले होते, ‘रमेश सिप्पी जी चित्रपटात गब्बरची भूमिका करण्यासाठी कोणालातरी शोधत होते. अमजद खान यांची सकाळी अचानक भेट झाली होती. मी त्याला पाहिलं आणि याआधीही मी त्याचा अभिनय अनेकदा पाहिला होता.

मी त्यांना दुसऱ्या दिवशी रमेशजींच्या कार्यालयात यायला सांगितले. यानंतर रमेशजींनी अमजदला पाहिले आणि म्हणाले की ठीक आहे हा माझ्या चित्रपटाचा गब्बर असेल.
शोले मधून चर्चेत आल्यानंतर अमजद खान यांचा एक भीषण अपघात झाला होता. त्यानंतर तो ‘कोमा’मध्ये गेला. यानंतर त्याने अनेक वेळा पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, पण त्यात त्यांना यश आले नाही. 1992 मध्ये त्यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नडणाऱ्यांसह काँग्रेस अन्‌‍ ठाकरे सेना क्लीन बोल्ड

महानगरपालिकेत डॉ. सुजय विखे पाटील -आमदार संग्राम जगताप एक्सप्रेेस निर्णायक ठरणार! सारिपाट / शिवाजी शिर्के प्रभाग...

वनविभागाच्या हलगर्जीपणामुळेच तरुणाचा बळी!, कळस येथील घटनेला जबाबदार कोण?

पिंजरा लावण्याची जबाबदारी का झटकली? गणेश जगदाळे। पारनेर पारनेर तालुक्याच्या पश्चिमेला असलेल्या जुन्नर तालुका राज्यात बिबट्या...

जिल्ह्यात लेझर लाईट, दबाव हॉर्न व कार्बन डायऑक्साइड वायूच्या वापरावर बंदी

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ (१) नुसार...

मैदान ठरलं; तोडफोडीमुळे ‘अशी’ राजकीय गणिते बदलली!, आता आरक्षणाकडे नजरा..

सुनिल चोभे | नगर सह्याद्री अहिल्यानगर महापालिका निवडणुकीची उलटगणती सुरु झाली असून निवडणुकीचा राजकीय रंग...