spot_img
अहमदनगरदेशाला एका कणखर नेतृत्वाची गरज: चेअरमन शिवाजीराव कर्डीले

देशाला एका कणखर नेतृत्वाची गरज: चेअरमन शिवाजीराव कर्डीले

spot_img

अहमदनगर नगर सह्याद्री
देशाला एका कणखर नेतृत्वाची गरज आहे आणि नरेंद्र मोदी हेच त्याला पर्याय आहेत. यामुळे नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीच्या उमेदवारा विजयी करा असे आवाहन माजी मंत्री तथा जिल्हा बॅं
केचे चेअरमन शिवाजीराव कर्डीले यांनी केले आहे. ते नगर तालूक्यातील महायुतीच्या सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी महायुतीचे उमेदवार खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या कामाबद्दल मतदारांना माहिती दिली.

तालूक्यातील येथे महायुतीचे उमेदवार खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ महायुतीच्या मेळाव्याचे इमामपूर येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बाजार समिती संचालक मधुकर मगर, दत्ता तापकीरे, धर्मनाथ आव्हाड, चेअरमन डॉ. मिनीनाथ दुसुंगे, संचालक डॉ. राजेंद्र ससे, आदेश भगत, सुरेश वारूळे उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने देशात मागील १० वर्षात विविध विकास कामे करून देशाला प्रगतीच्या पथावर आणले आहे. शेतकरी, कष्टकरी, तरूण, महिला आणि विद्यार्थांसाठी विविध योजना राबविल्या आहेत. यामुळे देशातील प्रत्येक घटकाचा विकास झाला. यामुळे येणाऱ्या काळात पंतप्रधान मोदींच्या हातात देश अधीक बळकट आणि सुरक्षित होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महायुतीचा उमेदवार हा प्रतिमोदी असून तुमचे मत हे सरळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळणार आहे. म्हणून महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी काम करा असे आवाहन त्यांनी केली. खा.सुजय विखे पाटील यांनी आपल्या खासदारीच्या काळात केलेल्या कामांची माहिती त्यांनी मतदारांना दिली. येणाऱ्या काळात अहिल्यानगच्या विकासासाठी एक तरूण आणि महत्वाकांक्षी खासदार आपल्याला निवडून द्यायचा आहे असेही ते म्हणाले.

विखे कुटुंबाचे विकास हेच ध्येय
विखे कुटुंबाने विकास हेच ध्येय ठेऊन नगरसाठी काम केले आहे. माझ्या पाच वर्षाच्या छोटाशा काळात मला जितके शक्य झाले, तितकी विकास कामे केली आहेत आणि ती कामे आज नगर मध्ये दिसतात. येणाऱ्या काळातही पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली नगर जिल्ह्यात जास्तीत जास्त निधी मिळवून विकासकामे केली जातील. त्यात पायाभूत सेवा सुविधांपासून अत्याधुनिक सेवांचा समावेश आहे.  नगरमधील विविध प्रश्न येणाऱ्या काळात संसदेत मांडून त्याचे समाधान केले जाईल. 

– खासदार सुजय विखे पाटील

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बावडी शिवारात धक्कादायक प्रकार; चार आरोपींना तात्काळ अटक!, नेमकं काय घडलं?

श्रीगोंदा । नगर सहयाद्री:- तालुक्यातील बावडी शिवारात गायी व गोऱ्यांची वाहतूक करणाऱ्या मजुरावर चार...

खळबळजनक! विकासकामांचे ४५ बनावट जीआर; कोट्यवधींचा पर्दाफाश; नगरमध्ये चाललंय काय?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शासकीय यंत्रणेमध्ये वारंवार विविध घोटाळे, भ्रष्टाचार समोर येत असतानाच आता...

आमदार दाते यांनी पारनेरचे मुद्दे गाजवले!, विधानसभेत पोलिसांच्या शौर्याचा गौरव करत केली मोठी मागणी..

पारनेर । नगर सहयाद्री:- तालुक्यात दिवसेंदिवस वाढत चाललेली कायदा व सुव्यवस्थेची समस्या, अमली पदार्थांचे...

खुशखबर! राज्यात मेगा भरती: मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली मोठी माहिती..

मुंबई । नगर सहयाद्री राज्यात 150 दिवसांच्या उद्दिष्टपूत कार्यक्रमानंतर राज्यात मेगा भरती होणार आहे....