spot_img
अहमदनगरढगाळ वातावरण! कांदा उत्पादक चिंतेत; काय होणार परिणाम

ढगाळ वातावरण! कांदा उत्पादक चिंतेत; काय होणार परिणाम

spot_img

श्रीगोंदा | नगर सह्याद्री

श्रीगोंदा तालुयामध्ये कांदा काढणीचा हंगाम जोरात सुरू आहे. परंतु  सध्या ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. अचानक पाऊस पडला, तर कांद्याचे मोठे नुकसान होईल, या भीतीने शेतकरी चिंताग्रस्त आहेत.
यंदा श्रीगोंदा तालुयातील घुगलवडगाव, देऊळगाव, भानगाव, ढोरजा कोळगाव, आढळगाव, बेलवंडी या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात उन्हाळी कांद्याची लागवड झाली आहे.

सध्या सर्वत्र कांदा काढणी जोरात सुरू आहे. परंतु, दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण होत आहे. पाऊस पडण्याची शयता देखील दिसून येत आहे. तसेच काही भागांमध्ये पावसाच्या हलया सरी कोसळल्या आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकर्‍यांमध्ये कमालीची चिंता निर्माण झाली आहे.
शेतकर्‍यांनी काढलेला कांदा शेतामध्ये ठेवला आहे. परंतु, गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण झाल्याने शेतकर्‍यांनी तातडीने हा सगळा कांदा कांदा चाळीत साठवायला सुरुवात केली आहे. दुसरीकडे कांदा काढणीला मजूर मिळत नाही. त्यामुळे इतर जिल्ह्यांसह परराज्यांतून मजुरांना एकरी कांदा काढणे व साठवून ठेवण्याचे काम दिले जात आहे.

अवकाळी पाऊस झाल्यास कांद्याचे मोठे नुकसान
यंदाच्या वर्षी कांद्याला चांगला बाजार भाव मिळत असल्याने शेतकर्‍यांचा कांदा पिक घेण्याकडे कल वाढला आहे. सध्या कांदा काढणीला आला आहे. परंतु ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतेत आहे. काढलेला कांदा भिजला तर मोठे नुकसान शेतकर्‍यांचे होणार आहे. अगोदरच कांद्याला बाजारभाव नाही, कांदा लागवड, कीटकनाशके-खते आणि आता काढणीचा खर्च, कोसळणारा बाजारभाव, आता निसर्गाची अवकृपा, आम्ही शेतकर्‍यांनी काय करायचे? असा सवाल घुगलवडगाव येथील शेतकरी राजू गलांडे यांनी व्यक्त केला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पारनेरमध्ये खासदार लंके गटाला मोठा धक्का; बड्या नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश

  पारनेर / नगर सह्याद्री- जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पारनेर येथे राष्ट्रवादी काँग्रेस...

‘साकळाई’ची प्रशासकीय मान्यता घेऊन तात्काळ भूमिपूजन, प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी

साकळाई योजना कृती समितीची बैठक हिवरे झरे येथे संपन्न सुनील चोभे / नगर सह्याद्री- नगर तालुक्यातील...

पारनेरमध्ये बिबट्या जेरबंद; भीतीच्या सावटाखाली ग्रामस्थ

पारनेरमध्ये बिबट्या जेरबंद; भीतीच्या सावटाखाली ग्रामस्थ शेतकऱ्याची शेळी खाल्ल्यानंतर वन विभागाची मोहीम यशस्वी सुपा / नगर...

वनविभागाच्या निष्क्रियता: पारनेर तालुक्यात बिबट्यांचा वाढता उपद्रव; कळस येथील घटनेने खडकवाडी येथील घटनेची आठवण!

गणेश जगदाळे | नगर सह्याद्री पारनेर तालुक्याच्या उत्तर भागात मुळा नदीचा पट्टा व मुळा धरण...