spot_img
अहमदनगरढगाळ वातावरण! कांदा उत्पादक चिंतेत; काय होणार परिणाम

ढगाळ वातावरण! कांदा उत्पादक चिंतेत; काय होणार परिणाम

spot_img

श्रीगोंदा | नगर सह्याद्री

श्रीगोंदा तालुयामध्ये कांदा काढणीचा हंगाम जोरात सुरू आहे. परंतु  सध्या ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. अचानक पाऊस पडला, तर कांद्याचे मोठे नुकसान होईल, या भीतीने शेतकरी चिंताग्रस्त आहेत.
यंदा श्रीगोंदा तालुयातील घुगलवडगाव, देऊळगाव, भानगाव, ढोरजा कोळगाव, आढळगाव, बेलवंडी या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात उन्हाळी कांद्याची लागवड झाली आहे.

सध्या सर्वत्र कांदा काढणी जोरात सुरू आहे. परंतु, दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण होत आहे. पाऊस पडण्याची शयता देखील दिसून येत आहे. तसेच काही भागांमध्ये पावसाच्या हलया सरी कोसळल्या आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकर्‍यांमध्ये कमालीची चिंता निर्माण झाली आहे.
शेतकर्‍यांनी काढलेला कांदा शेतामध्ये ठेवला आहे. परंतु, गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण झाल्याने शेतकर्‍यांनी तातडीने हा सगळा कांदा कांदा चाळीत साठवायला सुरुवात केली आहे. दुसरीकडे कांदा काढणीला मजूर मिळत नाही. त्यामुळे इतर जिल्ह्यांसह परराज्यांतून मजुरांना एकरी कांदा काढणे व साठवून ठेवण्याचे काम दिले जात आहे.

अवकाळी पाऊस झाल्यास कांद्याचे मोठे नुकसान
यंदाच्या वर्षी कांद्याला चांगला बाजार भाव मिळत असल्याने शेतकर्‍यांचा कांदा पिक घेण्याकडे कल वाढला आहे. सध्या कांदा काढणीला आला आहे. परंतु ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतेत आहे. काढलेला कांदा भिजला तर मोठे नुकसान शेतकर्‍यांचे होणार आहे. अगोदरच कांद्याला बाजारभाव नाही, कांदा लागवड, कीटकनाशके-खते आणि आता काढणीचा खर्च, कोसळणारा बाजारभाव, आता निसर्गाची अवकृपा, आम्ही शेतकर्‍यांनी काय करायचे? असा सवाल घुगलवडगाव येथील शेतकरी राजू गलांडे यांनी व्यक्त केला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दुचाकीच्या डिक्कीतुन साडेपाच लाख पळविले; नगरमध्ये कुठे घडली घटना पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री कृषी विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने त्याच्या दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेली ५ लाख...

पुढील 24 तास धोक्याचे… ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपणार, हवामान खाते काय म्हणतेय पहा

मुंबई / नगर सह्याद्री - गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईसह राज्यातील काही भागांना मान्सूनच्या पावसानं...

उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; ‘या’ तारखेपासून ओला, उबेर बंद!

Taxi Ban:- कर्नाटक उच्च न्यायालयाने घेतलेल्या निर्णयामुळे ओला, उबर आणि रॅपिडोसारख्या बाईक टॅक्सी अ‍ॅग्रीगेटर्सना...

रामदेव बाबांचा धक्कादायक दावा; विमान दुर्घटनेत ‘या’ देशाचा हात?

Ramdev Baba: अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया विमान अपघाताने संपूर्ण देश हादरला असतानाच, योगगुरू रामदेव...