spot_img
ब्रेकिंगAhmednagar Crime: धक्कादायक! मध्यरात्री मित्राच्या घरी गेला, धारदार शस्राने खून केला

Ahmednagar Crime: धक्कादायक! मध्यरात्री मित्राच्या घरी गेला, धारदार शस्राने खून केला

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री-
जिल्ह्यात पुन्हा एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. मित्राने धारदार शस्राने वार करून मित्राचा खून केल्याची घटना घडली आहे. मोल नवनाथ आठरे (रा. कौडगाव आठरे, ता. पाथर्डी) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. त्याने 4 मे 2024 रोजी रात्री त्याचा मित्र अविनाश बाळू जाधव (रा. मांडवे) यांचा खून केल्याची कबुली दिली आहे.

अधिक माहिती अशी: मांडवे (ता. पाथर्डी) येथील खून प्रकरणात मित्रच खुनी निघाल्याने त्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. अमोल व अविनाश दोघे मित्र होते. त्यामुळे अमोलचे आईवडिल त्याला व अविनाशला रागावून बोलत असे.

1 मे 2024 रोजी अविनाशने अमोलच्या वडिलांना तिसगावात गाठले व त्याने शिवीगाळ करून हातपाय तोडून टाकण्याची धमकी दिली. त्यांच्याकडील दूध सांडून दिले. याच कारणातून अमोलने अविनाशला जाब विचारला असता त्याने अमोलला सुध्दा शिवीगाळ, दमदाटी केली होती. त्याच दिवशी अविनाशचा काटा काढण्याचे अमोलने ठरवले होते.

4 मे रोजी रात्री 12 ते 1 सुमारास अमोलने घरातून ऊस तोडण्याचा कोयता घेतला व दुचाकीवरून अविनाशच्या घरी निघाला. अमोलने त्याच्याकडील कोयत्याने अविनाशच्या डोक्यात व पाठीवर वार करून त्याची हत्या केल्याची कबुली दिली आहे.

असा अडकला जाळ्यात
गुन्हा घडल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. पथकाने अविनाशचे कोणासोबत वाद होते का? याची माहिती घेतली असता त्यांचा मित्र अमोल आठरे याचे नाव समोर आले. त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले असता त्याने अविनाशचा खून केल्याची कबुली दिली. खुनी अमोल आठरे याला अटक करून पाथर्डी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...