spot_img
ब्रेकिंगAhmadnagar Breaking: गुलाबी थंडी आणि दाट धुके! नगरवर धुक्याची 'चादर', बळीराजा पुन्हा...

Ahmadnagar Breaking: गुलाबी थंडी आणि दाट धुके! नगरवर धुक्याची ‘चादर’, बळीराजा पुन्हा संकटात…

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री-

गुलाबी थंडी आणि दाट धुके!! असे मनमोहक वातावरण नगरकरांनी गुरुवारी अनुभवले. सकाळी दहा वाजेपर्यंत शहरासह सावेडी उपनगरामध्ये धुके होते. गुरुवारी सकाळी संपूर्ण शहरच धुयात हरवले होते. यंदाच्या मोसमातील या अनोख्या संधीचा अबालवृद्धांनी मनमुराद आनंद लुटला. दिल्लीगेट परिसर, लोखंडी पूल, सावेडी, केडगाव उपनगरांत दोन दिवसांपासून धुके दिसत आहे.

गेल्या आठवड़यापासून शहर व परिसरात हवामानात बदल होत आहे. याचा परिणाम म्हणून गुरुवारी पहाटेच्या वेळी धुयाची चादर पसरलेली दिसली. सकाळी सहा ते सात वाजण्याच्या दरम्यान घराबाहेर पडलेल्यांना धुयाची दुलई अनुभवण्याची संधी मिळाली. अनेकांनी मोबाइलमध्ये दृश्य टिपण्याचा प्ऱयत्न केला.

वाहनचालकांना रस्त्यांचा अंदाज येत नसल्याने नगर-मनमाड, नगर-पुणे, नगर-औरंगाबाद, अशा प्रमुख महामार्गांवरील वाहतूक संथगतीने सुरू होती. पंधरा ते वीस फुटांवरील घरे, वाहनेही धुयामुळे दिसत नव्हती. त्यामुळे वाहनांचे दिवे सुरू ठेवण्याशिवाय चालकांसमोर पर्याय नव्हता. पहाटे व्यायाम किंवा फिरायला जाणार्‍या नागरिकांनी धुयाचा आनंद घेतला.

पिकांवर परिणाम

दुष्काळ, अवकाळी पावसामुळे अगोदरच बळीराजा संकटात सापडला आहे. त्यातच सध्या पिकांवर धुक्याची चादर ओढवली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा धुक्यामुळे पिकांवर मोठा परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. कांदा, फळ पिकांवर धुक्याचा मोठा परिणाम होत असतो. गुलाबी थंडी आणि दाट धुके असे वातावरण मनमोहक असले तरी शेतकर्‍यांसाठी मात्र हे धुके नुकसानकारक असल्याचे शेतकर्‍यांमधून सांगितले जाते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ओबीसी आरक्षण कमी झाल्याचा पुरावा आहे का? राधाकृष्ण विखे पाटील काय म्हणाले पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - ओबीसी आरक्षणावरून शुक्रवारपासून वातावरण पुन्हा तापले आहे. बीडमध्ये ओबीसी...

अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांना 846 कोटी 96 लाख रुपयांची मदत; पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

अहिल्यानगर | नगर सह्याद्री सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यातील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर...

मनसे-महाविकास आघाडीच्या मागणीला यश; निवडणूक आयोगाचे मतदार यादीतील घोळ तपासण्याचे आदेश

मुंबई । नगर सहयाद्री  राज्यातील मतदार यादीमधील घोळ आणि गैरव्यवहाराच्या गंभीर आरोपांनंतर निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना...

साई संस्थानमधील ४७ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल;नेमकं प्रकरण काय?

शिर्डी । नगर सहयाद्री:- साईबाबा संस्थानच्या विद्युत विभागातील तब्बल ७७ लाख रुपयांच्या विद्युत साहित्याच्या...