spot_img
ब्रेकिंगमुख्यमंत्र्यांचे ठाकरेंना आव्हान ; मी अडीच वर्षाचं रिपोर्ट कार्ड सर्वांसमोर ठेवायला तयार,...

मुख्यमंत्र्यांचे ठाकरेंना आव्हान ; मी अडीच वर्षाचं रिपोर्ट कार्ड सर्वांसमोर ठेवायला तयार, हिंमत असेल तर तुम्हीसुद्धा ठेवा

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री –
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यातील भाषणातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर जोरदार टीका केली.’जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो’ ही गर्जना करून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जेव्हा भाषणाची सुरुवात करायचे तेव्हा सर्वांच्या अंगावर काटा उभा राहायचा. ‘गर्व से कहो हम हिन्दू हैं’. ही सिंहगर्जना बाळासाहेबांनी सर्वांना दिली. काही जणांना आता हिंदू म्हणून घेण्याची लाज वाटू राहिली आहे. हिंदुहृदयसम्राट म्हणायला काही जणांची जीभ कचरू लागली आहे. पण आपल्याला हा शब्द उच्चारायला लाज नाही तर अभिमान आणि स्वाभिमान वाटतो, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

गारगोट्यांना आता लाज वाटतेय. बाळासाहेबांच्या विचारांशी बेईमानी करणाऱ्यांपासून शिवसेना आपण मुक्त केली. म्हणून आझाद शिवसेनेचा हा आझाद मेळावा आहे. येथे शिवसैनिकांचा जनसागर आला आहे. चारही बाजूंनी लोक येत आहेत. याठिकाणी भगवा उत्साह संचारल्याचे ते म्हणाले.

खरं म्हणजे, महाराष्ट्र विरोधी आघाडीला घरी पाठवून आपलं सरकार आलं. तेव्हा काही लोक म्हणत होते. हे सरकार 15 दिवस टिकणार नाही. एका महिन्यात पडेल. दुसऱ्या महिन्यात पडेल. सहा महिन्यात पडेल. पण टीका करणाऱ्यांना हा एकनाथ शिंदे परून उरला. जनतेच्या आशीर्वादाने आणि साथीने घासून नाही तर ठासून दोन वर्षे पूर्ण केली. कारण मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. तर आनंद दिघे साहेबांचा चेला आहे. असा जाणार नाही. मला हलक्यात घेऊ नका, असे त्यांनी विरोधकांना ठणकावून सांगितले.

आम्ही धारावीकरांच्या मागे ठामपणे उभे आहोत. धारावीकर यांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. रमाबाई आंबेडकर नगर आम्ही म्हणून एस आर आणि एम एम आर डी ए ला दिला आहे. तिथे 17000 घर आम्ही देणार आहोत.मुंबई जे रखडलेले प्रकल्प आहे ज्यांना भाडं मिळत नाही काही लोकांना मुंबईच्या बाहेर जावे लागले हे सर्व प्रकल्प सरकार घेणार आणि पूर्ण करणार. मुंबईकर न्याय देण्याचा प्रयत्न करू असे मुख्यमंत्री म्हणाले.

त्यांचे सगळे काळे धंदे बंद केले. आपण फेसबुकमध्ये नाहीतर फेस टू फेस काम करणारे कार्यकर्ते आहोत. बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की, नेता घरात नाही तर कार्यकर्त्याच्या दारात चांगला दिसतो.मी मी उठाव केला नसता तर महाराष्ट्राचे चित्र असतं. सकाळ झाली मोर उठला. आंघोळ केली आणि मोरू पुन्हा झोपला. बाळासाहेबांच्या मागे अख्खी दिल्ली फिरायची आणि हा मुरू आता दिल्लीच्या मागे फिरतोय.मी आमच्या अडीच वर्षाचं रिपोर्ट कार्ड सर्वांसमोर ते ठेवायला तयार आहे तुम्ही सुद्धा तुम्ही दोन वर्षात काय केले ते हिम्मत असेल तर लोकांपुढे ठेवा, असे आव्हान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

कोरोनामध्ये खिचडी, कफन याच्यात पैसे कोणी खाल्ले ? मळ्याच्या टाळूवरचे लोणी खाणारे तुम्ही आहात. तुमच्या तोंडाला लागलेले शेण अशांनी लपणार नाही. इथे लोक मारत होती आणि तुम्ही पैसे मोजत होतात, असा आरोप त्यांनी विरोधकांवर केला. आम्ही पीपी चेक करून लोकांना मदत करत होतो हॉस्पिटलमध्ये जात होतो. तुम्ही घरात बसून करून मंत्री याला त्याला बाहेर, आमदार आला त्याला बाहेर…असं करत होता. तुम्ही काय केलं ते जाईल ते सांगू शकत नाही पण वेळ इथे योग्य वेळी मी ते सर्व सांगेन, असे ते म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगरमधील तीन युवकांचा मृत्यू; तिरुपतीवरुन परत येतांना नेमकं काय घडलं?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री :- अहिल्यानगर जिल्हयातील शेवगाव येथील युवकांच्या अपघताचे वृत्त समोर आले...

आमदार संजय गायकवाडांचा राडा; कँटिन ऑपरेटरला लाथा-बुक्क्‌‍यांनी मारहाण, कारण काय?

मुंबई । नगर सहयाद्री वादग्रस्त वक्तव्यांमुळे सातत्याने चर्चेत राहणारे शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड...

प्रवरेला पूर; अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘या’ गावांचा संपर्क तुटला

संगमेनर । नगर सहयाद्री:- अकोले तालुक्यातील भंडारदरा व निळवंडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील घाटघर-रतनवाडी-हरिश्चंद्रगड-कुमशेत-साम्रद भागात...

पारनेरकरांना खुशखबर! सुजित झावरे पाटील यांच्या पाठपुराव्यास यश; ‘या’ कामांसाठी जलसंपदा विभागाची मंजुरी

पारनेर । नगर सहयाद्री:- तालुक्यातील कुकडी डावा कालव्यावरील पुलांच्या कामांस मंजुरी देण्याचे निर्देश जलसंपदा...