spot_img
महाराष्ट्रमोठी बातमी ! छगन भुजबळांना ओबीसींचा उठाव करण्याची गरज नव्हती, पहा मंत्री...

मोठी बातमी ! छगन भुजबळांना ओबीसींचा उठाव करण्याची गरज नव्हती, पहा मंत्री विखेंचा घणाघात

spot_img

अहमदनगर / नगर सह्याद्री : 
आरक्षणाच्या मुद्द्यावरून जो एल्गार सुरु आहे त्यावर आता राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोठे वक्तव्य केले आहे. मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका करत ओबीसींचे आंदोलन, उठाव करण्याची गरज नव्हती, असे मंत्री विखे यांनी म्हटलंय.

एकीकडे मनोज जरांगे पाटील यांनी सध्या महाराष्ट्राभर सभा घेत मागणीला धार लावली आहे तर दुसरीकडे ओबीसी नेते आरक्षणाला विरोध करताना दिसतायेत. यातच आता मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोठे वक्तव्य केले आहे. मराठा आरक्षणाची धार वाढत चालली आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी जी आरक्षणविषयी मागणी केलीये त्या मागणीला सरकारची संमती आहे. परंतु जर शासनाने दोन जानेवारीपर्यंत मुदत घेतली, वेळ मागितला आहे तर जरांगे पाटील यांनीही संयम ठेवायला हवा. त्यांनी सरकारला वेळ दिला आहे त्यामुळे शासन योग्य निर्णय घेईलच.

त्याचप्रमाणे छगन भुजबळ यांनी जो ओबीसींचा उठाव केला त्याची आवश्यकता नव्हती असं मला वाटत. सरकारने जर मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची भूमिका घेतली असती, तर हा उठाव करणं एकदम योग्य होत पण जर कुणी आरक्षण मागत असेल म्हणून त्याला विरोध करणं व करण्यासाठी ओबीसींचे आंदोलन उभे करणे हे योग्य नाही, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

वैष्णवी हगवणेचा मृत्यू कसा झाला? पोस्टमार्टममधून धक्कादायक माहिती समोर

पुणे / नगर सह्याद्री - राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे नेते राजेंद्र हगवणे यांच्या...

धक्कादायक! मुख्याध्यापिकेनेच शिक्षक पतीला संपवलं, मृतदेह टाकला जाळून, कुठे घडला प्रकार पहा

यवतमाळ / नगर सह्याद्री - महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यात एक खळबळजनक हत्याकांड उघडकीस आले आहे....

IAS पूजा खेडकर प्रकरणात मोठी अपडेट; ‘सर्वोच्च न्यायालयाने जामीन..’

मुंबई । नगर सहयाद्री:- वादग्रस्त ठरलेल्या माजी आयएएस प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांना सर्वोच्च...

नगर जिल्ह्यात खळबळ! बिबट्या अडकला पिंजऱ्यात; एकाच ठिकाणी चार-चार?

अहिल्यानगर। नगर सहयाद्री :- अहिल्यानगर जिल्ह्यातील कोल्हार बुद्रुकमध्ये एकापाठोपाठ चार बिबटे जेरबंद करण्यात आले...