spot_img
महाराष्ट्रमोठी बातमी ! छगन भुजबळांना ओबीसींचा उठाव करण्याची गरज नव्हती, पहा मंत्री...

मोठी बातमी ! छगन भुजबळांना ओबीसींचा उठाव करण्याची गरज नव्हती, पहा मंत्री विखेंचा घणाघात

spot_img

अहमदनगर / नगर सह्याद्री : 
आरक्षणाच्या मुद्द्यावरून जो एल्गार सुरु आहे त्यावर आता राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोठे वक्तव्य केले आहे. मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका करत ओबीसींचे आंदोलन, उठाव करण्याची गरज नव्हती, असे मंत्री विखे यांनी म्हटलंय.

एकीकडे मनोज जरांगे पाटील यांनी सध्या महाराष्ट्राभर सभा घेत मागणीला धार लावली आहे तर दुसरीकडे ओबीसी नेते आरक्षणाला विरोध करताना दिसतायेत. यातच आता मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोठे वक्तव्य केले आहे. मराठा आरक्षणाची धार वाढत चालली आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी जी आरक्षणविषयी मागणी केलीये त्या मागणीला सरकारची संमती आहे. परंतु जर शासनाने दोन जानेवारीपर्यंत मुदत घेतली, वेळ मागितला आहे तर जरांगे पाटील यांनीही संयम ठेवायला हवा. त्यांनी सरकारला वेळ दिला आहे त्यामुळे शासन योग्य निर्णय घेईलच.

त्याचप्रमाणे छगन भुजबळ यांनी जो ओबीसींचा उठाव केला त्याची आवश्यकता नव्हती असं मला वाटत. सरकारने जर मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची भूमिका घेतली असती, तर हा उठाव करणं एकदम योग्य होत पण जर कुणी आरक्षण मागत असेल म्हणून त्याला विरोध करणं व करण्यासाठी ओबीसींचे आंदोलन उभे करणे हे योग्य नाही, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘गाडी बाजूला घे’ म्हटल्याचा राग; एसटी बसचालकाला मारहाण, बसवर दगडफेकही

  अहिल्यानगर | नगर सह्याद्री शहरातील पुणेरोड बसस्थानकाजवळील स्वस्तिक चौकात ‘एसटी बस वळवण्यास अडथण होत आहे,...

दारूड्याचा भाऊजीवर सपासप चाकूहल्ला ; कुठे घडला प्रकार पहा

लालटाकी येथे कौटुंबिक वाद विकोपाला; पत्नीलाही बेदम मारहाण अहिल्यानगर | नगर सह्याद्री येथील लालटाकी भागातील बारस्कर...

प्रस्तापितांचा विरोध पत्करला पण शिवाजीराव कर्डीले यांनी सर्वसामान्यांशी नाळ तुटू दिली नाही, आता अक्षय कर्डीले यांनी…

  आम्ही सर्व अक्षय कर्डिलेंच्या पाठिशी ः प्रा. राम शिंदे/ सहकार सभागृहातील सर्वपक्षीय शोकसभेत स्व....

उमेदवारांसाठी आनंदाची बातमी, आयोगाने घेतला सर्वात मोठा निर्णय

मुंबई / नगर सह्याद्री - महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे महाराष्ट्रात पडघम वाजले आहेत....