spot_img
महाराष्ट्रमोठी बातमी ! छगन भुजबळांना ओबीसींचा उठाव करण्याची गरज नव्हती, पहा मंत्री...

मोठी बातमी ! छगन भुजबळांना ओबीसींचा उठाव करण्याची गरज नव्हती, पहा मंत्री विखेंचा घणाघात

spot_img

अहमदनगर / नगर सह्याद्री : 
आरक्षणाच्या मुद्द्यावरून जो एल्गार सुरु आहे त्यावर आता राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोठे वक्तव्य केले आहे. मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका करत ओबीसींचे आंदोलन, उठाव करण्याची गरज नव्हती, असे मंत्री विखे यांनी म्हटलंय.

एकीकडे मनोज जरांगे पाटील यांनी सध्या महाराष्ट्राभर सभा घेत मागणीला धार लावली आहे तर दुसरीकडे ओबीसी नेते आरक्षणाला विरोध करताना दिसतायेत. यातच आता मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोठे वक्तव्य केले आहे. मराठा आरक्षणाची धार वाढत चालली आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी जी आरक्षणविषयी मागणी केलीये त्या मागणीला सरकारची संमती आहे. परंतु जर शासनाने दोन जानेवारीपर्यंत मुदत घेतली, वेळ मागितला आहे तर जरांगे पाटील यांनीही संयम ठेवायला हवा. त्यांनी सरकारला वेळ दिला आहे त्यामुळे शासन योग्य निर्णय घेईलच.

त्याचप्रमाणे छगन भुजबळ यांनी जो ओबीसींचा उठाव केला त्याची आवश्यकता नव्हती असं मला वाटत. सरकारने जर मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची भूमिका घेतली असती, तर हा उठाव करणं एकदम योग्य होत पण जर कुणी आरक्षण मागत असेल म्हणून त्याला विरोध करणं व करण्यासाठी ओबीसींचे आंदोलन उभे करणे हे योग्य नाही, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मान्सूनची पुन्हा गर्जना; ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता

Maharashtra Monsoon:वेळेआधीच दाखल मान्सूनने यंत्रणांची पोलखोल केली आणि मान्सून पुन्हा गायब झाला.. मात्र 3...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशीच्या लोकांनी सावध रहा, तुमची प्रगती त्यांना सहन होत नाही

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य तुमच्या प्रकृतीची चिंता सोडा. आजारावर जालीम लसीकरण लाभदायी...

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...