spot_img
अहमदनगरअहमदनगरमध्ये पाच महाविद्यालयांत चाणक्‍य कौशल्‍य विकास केंद्रांची सुरुवात ! पालकमंत्री विखे पाटील...

अहमदनगरमध्ये पाच महाविद्यालयांत चाणक्‍य कौशल्‍य विकास केंद्रांची सुरुवात ! पालकमंत्री विखे पाटील यांच्या प्रयत्नांना यश

spot_img

राहाता / नगर सह्याद्री : पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या पुढाकाराने जिल्‍ह्यात पाच चाणक्‍य कौशल्‍य विकास केंद्रांची सुरुवात झाली आहे. या पाचही केंद्रांचा प्रारंभ आज उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कौशल्‍य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्‍या उपस्थितीत दुरदृष्‍य प्रणालीने करण्‍यात आला.

नगर जिल्‍ह्यात नुकताच नमो महारोजगार मेळावा पार पडला. या मेळाव्‍यातच कौशल्‍य विकास केंद्राची उभारणी करण्‍याची घोषणा करण्‍यात आली होती. पालकमंत्री विखे पाटील यांच्‍या पाठपुराव्‍यामुळे जिल्हात पाच ठिकाणी चाणक्य कौशल्य विकास केंद्राचा प्रारंभ झाला आहे. यामध्‍ये शिर्डी साई रूरल इन्स्टिट्यूटच्या इंडस्ट्रियल ट्रेनिंग इस्टिट्युट राहाता, नगर येथील प्रेमराज सारडा महाविद्यालय, अहमदनगर कॉलेज, के.जे सोमय्या महाविद्यालय कोपरगाव, संजीवनी रुरल एज्‍युकेशन सोसायटी या महाविद्यालयांमध्‍ये हे केंद्र सुरु करण्‍यात आले आहे.

राहाता येथे झालेल्या या कार्यक्रमास प्रवरा ग्रामीण शिक्षक संस्थेचे संचालक ज्ञानदेव म्हस्के, गणेशचे माजी अध्यक्ष मुंकुदराव सदाफळ, सुरेशराव सदाफळ, संस्थेचे सह सचिव भारत घोगरे,डॉ.कल्हापुरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.शिवानंद हिरेमठ, अतांत्रिकचे संचालक डॉ.प्रदिप दिघे, प्राचार्य डॉ.सोमनाथ घोलप, कॅम्प संचालक डॉ.महेश खर्डे, आय.टी.आयचे प्राचार्य अर्जुन आहेर, सुनिल दंडवते, डॉ.संजय गुल्हाने, जिल्हा कौशल्य समन्वयक मच्छींद्र उकीडे आदी मान्यवर उपस्थित होते.

या कौशल्‍य विकास केंद्रातून विद्यार्थ्‍यांना आता मार्गदर्शना बरोबरच नोकरी मिळण्‍याच्‍या संधी, मुलाखती बाबतचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. बदलत्या शिक्षण पद्धतीने येणाऱ्या काळात कौशल्य आधारीत शिक्षणातून मोठी रोजगार निर्मीती होणार आहे. युवा शक्तीच्या जोरावर भारताची अर्थव्यवस्था ही मजबूत होऊन होण्यास मद्दत होणार आहे.कौशल्य विकास विद्यापीठाची स्थापना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वसमावेशक युवा धोरणामुळे भारतीय अर्थव्यवस्था बळकट होऊन याद्वारे युवकांना गरजेभिमुख कौशल्य प्राप्त होणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...