spot_img
अहमदनगरAhmednagar News Today: भव्यदिव्य सोहळाचा आनंदोत्सव साजरा करा! खासदार विखे पाटील यांचे...

Ahmednagar News Today: भव्यदिव्य सोहळाचा आनंदोत्सव साजरा करा! खासदार विखे पाटील यांचे नागरिकांना आवाहन

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून देशाचा विकास होत आहे. विविध विकास योजनांबरोबरच अयोध्या येथील श्री प्रभू राम मंदिर उभे राहावे ही देशवासयांची इच्छा त्यांनी पूर्ण केली. श्री प्रभू रामचंद्र १४ वर्षे वनवास संपवून अयोध्येत आल्यानंतर नागरिकांनी दिवे लावून दिवाळी साजरी केली. आता अनेक वर्षाचा मंदिर उभारण्याचा वनवास संपला असून प्रभू मंदिरात येतील. या मंदिराचा लोकार्पण सोहळा २२ जानेवारीला पंतप्रधान मोदींच्या हस्ते होईल. त्यावेळी आपण सर्वांनी दिवे लावून लाडू वाटून आनंदोत्सव साजरा करा असे आवाहन खा.डॉ.सुजय विखे यांनी केले.

माजी नगरसेवक निखिल वारे यांच्या पाठपुराव्यातून आणि खा.डॉ.सुजय विखे व आ.संग्राम जगताप यांच्या माध्यमातून विविध विकास कामाचा प्रारंभ तसेच साखर, डाळ वाटप कार्यक्रम पार पडला. यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी सभागृह नेते विनीत पाऊलबुद्धे, माजी नगरसेवक रूपाली वारे, संध्या पवार, सुनील त्रिंबके, बाळासाहेब पवार, रामदास आंधळे आदींसह नागरिक उपस्थित होते.

आमदार संग्राम जगताप म्हणाले, मनपा मधील नगरसेवक पदाचा कार्यकाळ संपला असला तरी जनतेच्या मनातले सेवक म्हणून तुम्ही राहणार आहात. कारण तुम्ही अनेक वर्षांपासून या भागातील जनतेचे सर्व प्रश्न मार्गी लावले आहेत. त्या माध्यमातून समाजामध्ये ऋणानुबंध निर्माण झाले असून एक प्रेमाचे नाते तयार झाले आहे.

आपण सर्वजण मिळून प्रभू श्री राम मंदिराचा लोकार्पण सोहळा उत्साहात साजरा करूया असे ते म्हणाले. माजी नगरसेवक निखिल वारे म्हणाले की, प्रभाग दोन मधील विकास कामांचे उद्घाटन खा.डॉ. सुजय विखे पाटील व आ. संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत झाले असून आता लवकरच निर्मलनगर येथे साखर व डाळ वाटप करण्यात येईल.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगर तालुक्यात बिबट्याची भीती; गावांना दिवसा वीज पुरवठा करावा

माजी सभापती अभिलाष घिगे, सरपंच भाऊसाहेब बहिरट यांची महावितरणकडे मागणी सुनील चोभे | नगर सह्याद्री गेल्या...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं भिजतं घोंगडं; याचिकेवर ‘या’ तारखेला सुनावणी होणार

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - स्थानिक स्वराज्य संस्थामधील आरक्षणाच्या मर्यादेबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकेबाबत मोठी...

कांद्याला भावच नाही, शेतकऱ्याने काय केले पहा…

रांधेतील शेतकर्‍याने कांद्याला भाव नसल्याने पीक केले नष्ट पारनेर | नगर सह्याद्री गेल्या वर्षभरात कांद्याला सरकारने...

अजित पवार.. सगळ्यांचा नाद करा, पण अनगरकरांचा नाय!; महाराष्ट्रात राजकारण तापले, माफीनामा अन कोण काय म्हणाले..

माजी आमदारपुत्राचं उपमुख्यमंत्र्यांना आव्हान; सोलापुरात वातावरण तापलं सोलापूर | नगर सह्याद्री सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुयातील अनगर...