spot_img
ब्रेकिंगBreaking : ठाकरे कुटुंबाला सरकारने घेरलं ! मुंबई महापालिकेच्या 25 वर्षाच्या...

Breaking : ठाकरे कुटुंबाला सरकारने घेरलं ! मुंबई महापालिकेच्या 25 वर्षाच्या कारभाराच्या चौकशीचे दिले आदेश

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री : शिंदे सरकारने ठाकरे कुटुंबाला घेरण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. आदित्य ठाकरे यांची एसआयटी चौकशी पाठोपाठ आता मुंबई महानगरपालिकेच्या गेल्या २५ वर्षांच्या कारभाराची चौकशी करण्याचे आदेश सरकारने काढले आहेत.

मुंबई मनपाच्या कारभाराची श्वेतपत्रिका काढण्याचा निर्णयच शासनाने घेतला असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. शिंदे सरकारच्या या निर्णयामुळे शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची अडचण होईल असे म्हटले जात आहे. सरकारच्या या निर्णयानंतर ठाकरे गटही आक्रमक झाला आहे. हिंमत असेल तर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका घेऊन दाखवा, जनता तुमच्या कामांचे ऑडिट करेल असा हल्ला ठाकरे गटाने केलाय.

उदय सामंत यांनी दिली ‘ही’ माहिती
मुंबई महानगरपालिकेमधील कोव्हीड काळातील झालेला गैरव्यवहार समोर आला होता. तसेच इतर अनेक गैरव्यवहाराचे आरोप होत असल्याने मुंबई महानगर पालिकेच्या कारभाराची चौकशी करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सामंत म्हणाले. मुंबई मनपाच्या सर्व आर्थिक व्यवहाराची चौकशी करण्यात येणार आहे. त्यासाठी श्वेतपत्रिका काढणार आहे असे उदय सामंत यांनी सांगितले. त्यानंतर विरोधकांनी पुणे, ठाणे, नागपूर आणि इतर मनपाच्या चौकशीची मागणी केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पोलीस नागरिकांच्या संरक्षणासाठी की लुटण्यासाठी?; आमदार जगताप यांचा सवाल

अहिल्यानगर । नगर सहयाद्री: - शहरातील कोतवाली व तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीमध्ये चोऱ्या दरोडे महिलांच्या...

शहर विकासाच्या आड मनपाच्या टीपीची किड!

पालकमंत्री विखे पाटलांनी स्वतंत्र बैठक घेण्याची गरज | आ. जगताप यांच्या विरोधात जनमत तयार...

सत्ताधारी पुरोगामी मंडळाला मोठा धक्का! परिवर्तन मंडळाचा २१ जागांवर विजय..

अहिल्यानगर। नगर सहयाद्री:- माध्यमिक शिक्षक सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत स्वाभिमानी परिवर्तन मंडळाने २१ जागांवर मुसंडी...

कार्यकर्त्यांची फौज अन्‌‍ जीवाला जीव देणाऱ्या निष्ठावंतांचं केडर जपणारे ‘अरुणकाका’

सारिपाट / शिवाजी शिर्के नगरपालिकेचा नगराध्यक्ष म्हणून कामकाज पाहिलेल्या अरुणकाका जगताप यांनी पुढे जाऊन काही...