spot_img
देशब्रेकिंग: मंत्रालयाला आग...! महत्वाचे कागदपत्रे जळून खाक, नेमकं काय घडलं? पहा..

ब्रेकिंग: मंत्रालयाला आग…! महत्वाचे कागदपत्रे जळून खाक, नेमकं काय घडलं? पहा..

spot_img

भोपाळ: मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये असलेल्या मंत्रालयाच्या इमारतीला (वल्लभ भवन) आज (शनिवारी) सकाळी मोठी आग लागली. आगीमुळे आजूबाजूच्या परिसरात खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, इमारतीच्या चौथ्या मजल्यावर आग लागली.

या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी रवाना झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ही आग इतकी भीषण आहे की त्याचा धूर आकाशात सर्वत्र दिसत आहे. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जीवित वा वित्तहानी झाली आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

आगीची माहिती मिळताच भोपाळ अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. ही घटना पाहताच अग्निसुरक्षा तज्ज्ञ पंकज खरे घटनास्थळी हजर आहेत. सध्या आगीचे कारण समजू शकलेले नाही. खासदारांचे सचिवालय वल्लभ भवनमध्ये आहे.

मुख्यमंत्र्यांचे कार्यालय येथे पाचव्या मजल्यावर आहे. आग एवढी भीषण होती की, अनेक महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाल्याचे सांगण्यात येत आहे. यापूर्वी वल्लभ भवनाजवळील सातपुडा भवनच्या तिसर्‍या मजल्यावर आग लागली होती. त्यात आरोग्य विभागाच्या अनेक महत्त्वाच्या फायली व कागदपत्रे जळाली होती.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

धक्कादायक! प्रियकराच्या घराबाहेर तृतीयपंथीयाची आत्महत्या

पुणे । नगर सहयाद्री:- पुण्यातील तृतीयपंथीयाला जयपूरचा तरूण आवडला. दोघांमधले प्रेम बहरले. ते दोघेही...

नैतिकता : धनुभाऊंना नाहीच; अजितदादा तुम्हाला? धनंजय मुंडेंना किती दिवस पोसणार?, चमच्यांमुळेच बीडची वाट लागली!

खंडणीखोर मुकादम, बेभान कार्यकर्ते, सत्तेचा माज असणारे नेते अन्‌‍ टुकार चमच्यांमुळेच बीडची वाट लागली!सारिपाट...

ट्रक दरीत कोसळून 10 जण ठार; कुठे घडला भयंकर अपघात!

नवी दिल्ली | नगर सह्याद्री:- कर्नाटकमध्ये बुधवारी सकाळी एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथे एक...

महाराष्ट्राच्या हाती मोठं घबाड! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दौऱ्यात काय-काय घडलं?

मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतल्या अनेक कंपन्यांच्या भेटी; सव्वासहा लाख कोटींवर गुंतवणूक करार मुंबई | नगर...