spot_img
महाराष्ट्रब्रेकिंग ! मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण मागे, आता उद्यापासून...

ब्रेकिंग ! मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण मागे, आता उद्यापासून…

spot_img

जालना / नगर सह्याद्री : मनोज जरांगे यांच्या आंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या आमरण उपोषणाबाबत महत्वाची माहिती समोर अली आहे. १७ दिवसानंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेण्याची घोषणा केली आहे.

जरांगे पाटील हे डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेणार असून उद्यापासून साखळी उपोषण करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली आहे. त्यांनी उपचार घेण्याची तयारी दाखवली आहे. उद्यापासून धरणे आणि साखळी उपोषण करा असं ते मराठा बांधवांना म्हणाले आहेत. हॉस्पिटलमध्ये दोन दिवस उपचार घेऊन आणि त्यानंतर दोन-तीन दिवसानंतर ते पुन्हा महाराष्ट्र दौरा करणार आहेत. अंबडमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे लोकांना त्यांना भेटता येत नाहीये. यासाठी ते आता स्तत:च लोकांच्या भेटी घेणार आहेत. यासाठी त्यांनी उपोषण मागे घेत असल्याचं जाहीर केलंय. गावातील महिलांच्या हातून रस पेऊन ते उपोषण मागे घेणार असल्याचं कळतंय. आंदोलनाची पुढची दिशा ते लवकरच जाहीर करणार आहेत.

दरम्यान शंभूराजे देसाई यांनी ईसार दिला आहे. ते म्हणाले, राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी गृहविभागाला एवढंच सांगितलं आहे की अशा भडक वक्तव्यामुळे अशा पद्धतीचं कायदा सुव्यवस्थेला धोका पोहोचणार असेल,

संवैधानिक पदावर बसलेल्या नेत्याचा अशा पद्धतीने अवमान होत असेल तर कायदा कायद्याचं काम करेल. पोलीस पोलिसांचं काम करतील. त्यांची वक्तव्ये तपासली जातील. चौकशी केली जाईल. कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जे जे करावं लागेल ते आम्ही निश्चितपणाने करू अशीही माहिती शंभूराज देसाई यांनी दिली.

 

 

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगर शहरात परीक्षेच्या तयारीसाठी आलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री अल्पवयीन मुलीशी प्रेमाचे नाटके करत, वारंवार फोटो व्हायरल करण्याची धमकी...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींच्या विजयाची सुरवात, भरघोस यश प्राप्त होणार..

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य मानसिक शांततेसाठी तुमचा तणाव दूर करा. चैतन्याने सळसळता...

पावसाळी अधिवेशन विरोधकांनी तापवलं; पहिल्याच दिवशी काय-काय घडलं?

मुंबई | नगर सह्याद्री आजपासून (दि.३० जून) राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे. हे...

पंजाबराव डख यांनी दिला शेतकऱ्यांना सल्ला; निसर्गाच्या विरोधात शेती कराल तर..

पारनेर । नगर सहयाद्री:- हवामानाचा अभ्यास करून शेती करणे ही काळाची गरज आहे. मोठ्या...