spot_img
राजकारणब्रेकिंग : राज्यसभेत जय हिंद, वंदे मातरम शब्दांवर बंदी, 'हे' १२ नवीन...

ब्रेकिंग : राज्यसभेत जय हिंद, वंदे मातरम शब्दांवर बंदी, ‘हे’ १२ नवीन नियम लागू

spot_img

मुंबई / नगर सहयाद्री
येत्या ४ डिसेंबरपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यसभेच्या सदस्यांसाठी नवीन नियमावली जारी केली आहे. यात अनेक नवीन नियम करण्यात आले आहेत.

राज्यसभेच्या कोणत्याही सदस्याला ‘जय हिंद’ आणि ‘वंदे मातरम्’ हे शब्द उच्चारता येणार नाहीत. तसेच राज्यसभेचा खासदार ६० दिवस किंवा त्याहून अधिक काळ गैरहजर राहिल्यास त्याची जागा कायमची रिक्त राहील असा नवा नियम करण्यात आला आहे.

राज्यसभा कार्यालयाने ही नियमांची यादी जारी केली आहे. यामध्ये एकाच वेळी दोन सदस्यांना जागेवरून उठून प्रश्न विचारता येणार नाही. राज्यसभेत उपस्थित केले जाणारे प्रश्न सार्वजनिक केले जाणार नाहीत. तसेच, राज्यसभेच्या सभागृहात कोणत्याही प्रकारचे फलक झळकवण्यास बंदी घालण्यात आली आहे.

नवी नियमावली पुढीलप्रमाणे
1. राज्यसभेत उपस्थित केलेल्या मुद्द्यांची कोणतीही प्रसिद्धी करण्यात येऊ नये.
2. राज्यसभा सभापती नोटीस मंजूर करत नाही. इतर खासदारांना कळवत नाही तोपर्यंत ती नोटीस सार्वजनिक करू नये.
3. आत्तापर्यंत खासदार विशेषत: विरोधी पक्षाचे खासदार राज्यसभेत कोणताही महत्त्वाचा मुद्दा मांडण्यासाठी नोटीस देत असत पण आता असे होणार नाही.

4. सभागृहात धन्यवाद, आभार, जय हिंद, वंदे मातरम अशा घोषणा देऊ नयेत.
5. सभापती यांनी दिलेल्या व्यवस्थेवर सभागृहाच्या आत किंवा बाहेर टीका करू नये.
6. सभागृहात फलक, पोस्टर, बॅनर्स आणायला आणि लावायला बंदी आहे.
7. सभापती यांना सदस्यांनी पाठ दाखवून बाहेर जाऊ नये.
8. सभापती बोलत असताना कोणत्याही सदस्याने सभागृह सोडू नये.

9. सभापती बोलत असताना सभागृहात शांतता असावी.
10. सभागृहात दोन सदस्य एकाचवेळी उभे राहू शकत नाहीत.
11. सदस्यांनी थेट सभापती यांच्याशी संपर्क साधू नये. ते सहाय्यक यांच्यामार्फत स्लिप पाठवू शकतात.
12. सदस्यांनी सभागृहात लिखित भाषण वाचू नये.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पालकमंत्री विखेंवर भाजपची मोठी जबाबदारी; कोल्हेंना…

माजी खा. डॉ. सुजय विखे नगर दक्षिणचे, उत्तर नगर जिल्हा माजी आ. स्नेहलता कोल्हे...

राज ठाकरेंमुळे महाविकास आघाडीत फूट? नेमकं काय घडलं पहा

मुंबई / नगर सह्याद्री - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामुळे महाविकास आघाडी फुटणार का?...

पवनचक्कीचे कॉपर केबल चोरणारी टोळी जेरबंद; पोलिसांनी असा लावला सापळा

४ गुन्हे उघडकीस; ५ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त, मुख्य सूत्रधारासह तिघे अटकेत ​अहिल्यानगर /...

​घोसपुरीत दिवसाढवळ्या घरफोडी; दागिन्यांसह मोठा ऐवज लंपास

​अज्ञात चोरट्याविरुद्ध नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; परिसरात भीतीचे वातावरण ​अहिल्यानगर / नगर सह्याद्री...