spot_img
ब्रेकिंगBreaking ! जालन्यात धनगर आरक्षण मोर्चाला हिंसक वळण; जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक, वाहने...

Breaking ! जालन्यात धनगर आरक्षण मोर्चाला हिंसक वळण; जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक, वाहने फोडली

spot_img

जालना / नगर सह्याद्री : जालन्यामध्ये सुरु असणाऱ्या धनगर आरक्षण मोर्चाला हिंसक वळण लागले.
आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक केली.यावेळी शासकीय वाहने, दुचाकी गाड्यांची तोडफोड केली. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.

धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्याच्या मिळण्यासाठी गांधी चमन येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला होता. कार्यालयासमोर सभा घेण्यात आली. यानंतर निवेदन देताना समाज उग्र झाल्याने अनुचित प्रकार घडला.

मोर्चा दरम्यान जिल्हाधिकारी निवेदन स्वीकारायला खाली आली नाहीत, त्यामुळे आंदोलन आक्रमक झाले. यावेळी आंदोलकांनी गेटवरून जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. तसेच यावेळी तुफान दगडफेक करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या जिल्हाधिकारी परिसरात तणावाचे वातावरण होते. तत्काळ कार्यालयात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला. काही वेळाने आंदोलक परत गेली.

‘या’ आहेत मागण्या
धनगर समाजाला अनुसूचित जमाती आरक्षणाची (एसटी) अंमलबजावणी करावी
शहरातील अंबड चौफुली परिसरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकास जागा उपलब्ध करून द्यावी
जातनिहाय जनगणना करण्यात यावी
मेंढपाळांना शस्त्र परवाने द्यावे, मेंढ्यांना चरण्यासाठी वने राखीव ठेवावी

शेळी मेंढी विकास महामंडळास दहा हजार कोटींचा निधी देण्यात यावा
प्रत्येक जिल्ह्यात धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना मोफत वस्तीगृह उपलब्ध करून द्यावे
आरक्षण लढयात शहीद झालेल्या समाजबांधवांच्या कुंटूबातील एकास शासकीय नोकरी द्यावी
शासनामार्फत सवलतीच्या दरात कर्ज द्यावे
सर्वच क्षेत्रातील खासगीकरण रद्द करावे

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...