spot_img
राजकारणBreaking ! राजू शेट्टींवर गुन्हा दाखल, पहा काय आहे प्रकरण

Breaking ! राजू शेट्टींवर गुन्हा दाखल, पहा काय आहे प्रकरण

spot_img

सांगली / नगर सहयाद्री : पोलिसांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यासह दीडशे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे. जयंत पाटील यांच्या राजारामबापू साखर कारखान्याची तोडफोड केल्याप्रकरणी इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन दिवसांपूर्वी राजारामबापू कारखान्यात ऊस दरासाठी आंदोलन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उसाच्या दरासाठी झालेल्या आंदोलनामुळे १० तास कारखाना बंद असल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून लाखो रुपयांचे नुकसान केल्याचा आरोपही आंदोलकांवर करण्यात आला आहे.

१ डिसेंबर रोजी राजू शेट्टी यांनी कार्यकर्त्यांसह इस्लामपूर येथील राजारामबापू कारखान्याच्या वजन काट्याच्या समोरील मोकळ्या जागेत ऊसदराच्या प्रश्नावरून आंदोलन केले होते. या आंदोलनात दहा तासात कारखान्याचे आर्थिक नुकसान व्हावे, या उद्देशाने गाळप बंद करण्यात आले. यामुळे ऊस उत्पादक, तोडणी वाहतूकदार तसेच कारखान्यातील साखर, इथेनॉल निर्मिती, डिस्टिलरी व को-जनरेशन विभागाचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची तक्रार कारखान्याचे सचिव दिलीप महादेव पाटील यांनी पोलिसांत केली होती.

या तक्रारीनुसार, राजू शेट्टी, भागवत जाधव आदींसह १५० जणांवर इस्लामपूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान, ऊस दरावर तोडगा काढण्यासाठी राजारामबापू साखर कारखाना प्रशासनासोबत स्वाभिमानीची बैठक फिस्कटली आहे.

राजारामबापू साखर कारखान्याकडून ३१०० रुपये पहिली उचल आणि गेल्या हंगामातील ५० रुपये देण्याचा प्रस्ताव देण्यात आला. मात्र, रिकव्हरी रेटप्रमाणे पहिली उचल ३२०० रुपये देण्याच्या मागणीवर राजू शेट्टी यांनी ठाम भूमिका घेतली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बिबट्यांचे हल्ले थांबवा, अन्यथा शस्त्र परवाने द्या, कोणी केली मागणी पहा

पारनेर | नगर सह्याद्री पारनेर तालुयात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांचा वावर वाढल्याने शेतकरी, मजूर, शालेय...

हैदराबाद गॅझेट संदर्भात हाय कोर्टाचा मोठा निर्णय, काय दिलाय निर्णय?

मुंबई / नगर सह्याद्री मराठा समाजाला दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. हैदराबाद गॅझेटच्या...

व्होट चोरीवर राहुल गांधींचा सर्वात मोठा बॉम्ब!; मत अ‍ॅड अन् डिलीट कशी केली जातात? सर्व दाखवलं

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकांमध्ये मतचोरी झाल्याचा आरोप काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी...

…तर लक्ष्मण हाकेंना रस्त्यावर ठोकू, लेकीबाळीची इज्जत काढतोय; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

मुंबई / नगर सह्याद्री - ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केलेल्या लग्नाच्या वक्तव्यावरून राजकाराण तापलं...