spot_img
राजकारणBreaking ! राजू शेट्टींवर गुन्हा दाखल, पहा काय आहे प्रकरण

Breaking ! राजू शेट्टींवर गुन्हा दाखल, पहा काय आहे प्रकरण

spot_img

सांगली / नगर सहयाद्री : पोलिसांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यासह दीडशे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे. जयंत पाटील यांच्या राजारामबापू साखर कारखान्याची तोडफोड केल्याप्रकरणी इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन दिवसांपूर्वी राजारामबापू कारखान्यात ऊस दरासाठी आंदोलन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उसाच्या दरासाठी झालेल्या आंदोलनामुळे १० तास कारखाना बंद असल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून लाखो रुपयांचे नुकसान केल्याचा आरोपही आंदोलकांवर करण्यात आला आहे.

१ डिसेंबर रोजी राजू शेट्टी यांनी कार्यकर्त्यांसह इस्लामपूर येथील राजारामबापू कारखान्याच्या वजन काट्याच्या समोरील मोकळ्या जागेत ऊसदराच्या प्रश्नावरून आंदोलन केले होते. या आंदोलनात दहा तासात कारखान्याचे आर्थिक नुकसान व्हावे, या उद्देशाने गाळप बंद करण्यात आले. यामुळे ऊस उत्पादक, तोडणी वाहतूकदार तसेच कारखान्यातील साखर, इथेनॉल निर्मिती, डिस्टिलरी व को-जनरेशन विभागाचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची तक्रार कारखान्याचे सचिव दिलीप महादेव पाटील यांनी पोलिसांत केली होती.

या तक्रारीनुसार, राजू शेट्टी, भागवत जाधव आदींसह १५० जणांवर इस्लामपूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान, ऊस दरावर तोडगा काढण्यासाठी राजारामबापू साखर कारखाना प्रशासनासोबत स्वाभिमानीची बैठक फिस्कटली आहे.

राजारामबापू साखर कारखान्याकडून ३१०० रुपये पहिली उचल आणि गेल्या हंगामातील ५० रुपये देण्याचा प्रस्ताव देण्यात आला. मात्र, रिकव्हरी रेटप्रमाणे पहिली उचल ३२०० रुपये देण्याच्या मागणीवर राजू शेट्टी यांनी ठाम भूमिका घेतली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

IPL 2025 : चॅम्पियन RCB ला मिळालं करोडोंचं बक्षीस, पराभूत पंजाबवरही पैशांचा पाऊस, कोणाला किती पैसे मिळाले ?

नगर सह्याद्री वेब टीम - RCB Prize Money IPL 2025 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने अखेर...

18 वर्ष वाट पहायला लावलीस मित्रा… IPL चँपियन बनल्यावर विराटची पहिली पोस्ट

नगर सह्याद्री वेब टीम आयपीएल 2025 च्या सीझनमध्ये पायनल जिंकत ट्रॉफीवर नाव कोरणं हे...

एसटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, महागाई भत्ता अन् अपघात विमा!

मुंबई / नगर सह्याद्री - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण घोषणा...

IPL 2025 Final : आरसीबी आयपीएल चॅम्पियन, विराटचं स्वप्न अखेर पूर्ण

नगर सह्याद्री वेब टीम - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने अखेर 17 वर्षांची प्रतिक्षा संपवत इतिहास घडवला...