spot_img
देशनवी कार घेतली, पाच मित्र फिरायला गेले, पण..भीषण अपघात, एकच वाचला..

नवी कार घेतली, पाच मित्र फिरायला गेले, पण..भीषण अपघात, एकच वाचला..

spot_img

लखनऊ / नगर सह्याद्री : नवी कार घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. ते स्वप्नपुर्तीचा आनंदही काही वेगळाच असतो. परंतु हाच आनंद काही मित्रांच्या आयुष्यात अंधकार घेऊन आला.

तरूणाने मेहनत करून एक वॅगनॉर कार घेतली. नवी कार आल्याने मित्रांनी बराच आग्रह केल्यानंतर तो तरूण मित्रांसह कारमधून फेरी मारण्यास बाहेर गेला. पाच मित्र निघाले होते. फेरफटका मारून परतत असताना दाट धुक्यामुळे पुढचं काही नीट न दिसल्याने त्यांची कार रामगंगा नदीवर बांधलेल्या बॅरेजचे रेलिंग तोडून खाली कोसळली.

या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला, तर एकच जण बचावला आहे. ही घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे. धुक्यामुळे नीट दिसत नव्हतं आणि वेगाने जाणारी ती कार नियंत्रणाबाहेर गेला आणि पाण्यात पडली. कारच्या खिडक्या उघडता न आल्याने आत बसलेल्या चार तरूणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. .

पण कारमधील एक तरूण कसाबसा काच फोडून बाहेर आला. आणि कारच्या वरती उभा राहून आरडाओरडा करू लागला. त्याचा आवाज ऐकून स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेतली. पोलिस आल्यावर इतरांनाही वाचवायचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत खूपच उशीर झाला होता. कारमधील दोन प्रवासी सिकंदर (20) आणि महरूफ (28) हे नूरपूर छिबरी येथील गावप्रमुख रऊफ अहमद यांचा मुलगा आहेत. त्यांच्यासोबत खुर्शीद (३८), अब्दुल रशीद (२३) आणि फैसल (२२) हे त्याच गावातील तीन तरुण होते. या अपघातात सिकंदर बचावला आहे, बाकी चौघांचाही मृत्यू झाला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सालगड्याच्या अल्पवयीन मेहुणीवर शेतात अत्याचार! कुठे घडला प्रकार?

Crime News: शेतातील सालगड्याच्या अल्पवयीन मेहुणीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार लातूर जिल्ह्यातील औसामध्ये घडला...

लष्कराच्या हद्दीतील वाळू तस्करी महागात पडली; अधिकाऱ्यांनी पकडला डंपर

अहिल्यानगर । नगर सहयाद्री नांदगाव शिवारातील लष्कराच्या के. के. रेंज हद्दीतून अवैध वाळूची वाहतुक...

अजित दादांची ‘महानगर’ बँक निवडणुकीच्या विजयावर प्रतिक्रिया; ‘आता बँकेला…!

पारनेर। नगर सहयाद्री जी.एस.महानगर बँकेच्या सभासदांनी मोठ्या मताधिक्याने तुम्हाला निवडुन दिले आहे. या पाठबळामुळे...

Rain update: आठवडाभर मुसळधार! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

Rain update: देशाच्या विविध भागात झालेल्या पावसामुळे उष्णतेपासून मोठा दिलासा मिळाला आहे. भारतीय हवामान...