spot_img
देशनवी कार घेतली, पाच मित्र फिरायला गेले, पण..भीषण अपघात, एकच वाचला..

नवी कार घेतली, पाच मित्र फिरायला गेले, पण..भीषण अपघात, एकच वाचला..

spot_img

लखनऊ / नगर सह्याद्री : नवी कार घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. ते स्वप्नपुर्तीचा आनंदही काही वेगळाच असतो. परंतु हाच आनंद काही मित्रांच्या आयुष्यात अंधकार घेऊन आला.

तरूणाने मेहनत करून एक वॅगनॉर कार घेतली. नवी कार आल्याने मित्रांनी बराच आग्रह केल्यानंतर तो तरूण मित्रांसह कारमधून फेरी मारण्यास बाहेर गेला. पाच मित्र निघाले होते. फेरफटका मारून परतत असताना दाट धुक्यामुळे पुढचं काही नीट न दिसल्याने त्यांची कार रामगंगा नदीवर बांधलेल्या बॅरेजचे रेलिंग तोडून खाली कोसळली.

या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला, तर एकच जण बचावला आहे. ही घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे. धुक्यामुळे नीट दिसत नव्हतं आणि वेगाने जाणारी ती कार नियंत्रणाबाहेर गेला आणि पाण्यात पडली. कारच्या खिडक्या उघडता न आल्याने आत बसलेल्या चार तरूणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. .

पण कारमधील एक तरूण कसाबसा काच फोडून बाहेर आला. आणि कारच्या वरती उभा राहून आरडाओरडा करू लागला. त्याचा आवाज ऐकून स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेतली. पोलिस आल्यावर इतरांनाही वाचवायचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत खूपच उशीर झाला होता. कारमधील दोन प्रवासी सिकंदर (20) आणि महरूफ (28) हे नूरपूर छिबरी येथील गावप्रमुख रऊफ अहमद यांचा मुलगा आहेत. त्यांच्यासोबत खुर्शीद (३८), अब्दुल रशीद (२३) आणि फैसल (२२) हे त्याच गावातील तीन तरुण होते. या अपघातात सिकंदर बचावला आहे, बाकी चौघांचाही मृत्यू झाला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

शासकीय कामात अडथळा; तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल, वाचा नगर क्राइम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भिंगार परिसरात घरगुती वादाच्या चौकशीसाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना आरोपींनी धक्काबुक्की...

शरद पवार यांचा गंभीर आरोप; महायुतीच्या नेत्यांवर केली टीका., वाचा सविस्तर

मुंबई | नगर सह्याद्री निवडणुकीत कामावर नाही तर पैसे-निधीवर मतं मागितली जात आहेत. पैसे किती...

नो-पार्किंग कारवाईतील दंड कमी करा; अन्यथा मनपावर मोर्चा, कोणी दिला इशारा…

अहिल्यानगर / नगर सह्याद्री शहरातील वाहतूक नियोजनाच्या नावाखाली नो-पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांवर करण्यात येणारी...

वारंवार वीज पुरवठा खंडीत, उद्योजकांना फटका; प्रश्न सोडविण्यासाठी बैठक, काय झाला निर्णय?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- नगर-एमआयडीसी परिसरातील उद्योगांना वीज पुरवठा खंडित होण्यामुळे तीव्र फटका बसत असून,...