spot_img
लाईफस्टाईलअब्जाधीश जेआरडी टाटांना एकेकाळी थंडीपासून वाचण्यासाठी शर्टाच्या आत कोंबावे लागले होते ...

अब्जाधीश जेआरडी टाटांना एकेकाळी थंडीपासून वाचण्यासाठी शर्टाच्या आत कोंबावे लागले होते वर्तमानपत्रांच्या घडया, जाणून घ्या कहाणी

spot_img

नगर सह्याद्री टीम : जहांगीर रतनजी दादाभाई टाटा म्हणजेच जेआरडी टाटा यांचे नाव ऐकताच समोर उभा राहतो अत्यंत मोठा बिझनेसमन. समोर एका व्यावसायिक पायलटचे चित्र तयार होते, कारण त्यांच्याशी एअर इंडिया निर्माण करण्याच्या अनेक कहाण्या जोडल्या जातात.

आज व्यवसायामध्ये तसेच संपत्तीच्या बाबतीत त्यांचा हात कुणी धरू शकत नाही. अशा या मोठ्या बिझनेसमनला आणि एका मोठ्या समूहाच्या प्रमुखाला अर्थात जेआरडी टाटा यांना एकेकाळी अशा परिस्थितीचा सामना करावा लागला होता की स्वतःचे थंडीपासून रक्षण करण्यासाठी वर्तमानपत्राचा वापर करावा लागला होता. या घटनेचा उल्लेख त्यांच्या बियॉन्ड द लास्ट ब्लू माउंटन या पुस्तकात आहे.

ते सांगतात की ते हनिमूनसाठी कंचनजंगा पर्वतरांगा बघायला गेला होते, डिसेंबरची हिवाळ्याची वेळ होती, एके दिवशी ते दार्जिलिंगच्या टायगर हिलवर सूर्योदय पाहायला गेले होते, डोंगरावरून उगवणारा सूर्य पाहून त्याने ट्रेकिंगला सुरुवात करण्याचं ठरवलं पण जेआरडी हे विसरले की ते ज्या टेकड्या सर करणार आहेत ते माऊंट एव्हरेस्ट आहे.

त्या पुस्तकानुसार, जेआरडी त्यांच्या पत्नीसह घोड्यावर बसून टोंगल संदाकुफच्या दोन दिवसांच्या प्रवासाला निघाले. 12 हजार फुट वर पोहोचल्यावर त्यांना मनोहर सुंदर दृश्य दिसू लागली. पण प्रचंड थंडीही जाणवू लागली.

हिवाळा इतका तीव्र होता की त्यांना त्या थोड्या कपड्यानिशी तेथे थांबवणे शक्य नव्हते, म्हणून त्यांनी थंडीपासून वाचण्यासाठी अन स्वतःला उबदार ठेवण्यासाठी रात्रभर तेथे आगीमध्ये लाकडे पेटवत राहिले. आणि कपड्यांमध्ये वर्तमानपत्रांच्या घड्या करून ते आतून घातले. देशाला पहिली एयरलाइंस देणारे जेआरडी टाटा हे पायलटचे प्रमाणपत्र मिळवणारे पहिले भारतीय होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...

आ. दाते यांनी घेतली शेतकऱ्यांच्या मागणीची दखल! ‘या’ योजनेचा स्थानिक शेतकऱ्यांना फायदा होणार..

पारनेर । नगर सहयाद्री:- खडकवाडी गावातील शेतकऱ्यांनी पाझर तलावातील गाळ काढण्याची मागणी अनेक दिवसांपासून...