spot_img
अहमदनगरनगर अर्बन बँके संदर्भात मोठी अपडेट; 'या' तीन शाखा..

नगर अर्बन बँके संदर्भात मोठी अपडेट; ‘या’ तीन शाखा..

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
रिझर्व बँकेने नगर अर्बन बँकेचा व्यवसाय परवाना रद्द केल्यानंतर अवसायनात निघालेल्या नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या आणखी तीन शाखा ०८ नोव्हेंबर पासून बंद करण्यात येणार आहेत. दैनंदिन खर्चात बचत करण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती बँकेचे व्यवसायिक गणेश गायकवाड यांनी दिली.

बंद होणाऱ्या शाखांमध्ये बालमटाकळी, वांबोरी व कोल्हार भगवतीपुर या तीन शाखांचा समावेश असून बालमटाकळी शाखेचे कामकाज शेवगाव शाखेतून, वांबोरी शाखेचे कामकाज नगर मुख्य शाखेतून तर कोल्हार भगवतीपुर शाखेचे कामकाज बेलापूर शाखेतून होणार आहे. या तीनही शाखांच्या इमारती स्वमालकीच्या आहेत.

बंद होणाऱ्या शाखांमधील खातेदार लॉकर धारकांनी आपल्या लॉकर मधील मौल्यवान ऐवज / वस्तू काढून घेऊन लॉकरच्या चाव्या बँक प्रशासनाकडे सुपूर्द कराव्यात असे आवाहन देखील बँक प्रशासनाकडून करण्यात आले आहे.यापूर्वी भाडेतत्त्वावरील कार्यालय असलेल्या बँकेच्या 13 शाखा बंद करण्यात आलेल्या आहेत.

बँकेतील सर्व ठेवीदारांचे पैसे सुरक्षित असून डी आय सी जी सी व केंद्रीय निबंधक नवी दिल्ली यांच्या नियमानुसार व आदेशानुसार वितरण करण्याची प्रक्रिया सुरू असून सर्व ठेवीदारांनी केवायसीची पूर्तता करून आपले क्लेम फॉर्म नजीकच्या शाखेमध्ये लवकरात लवकर भरून द्यावेत असे आवाहन अवसायक गणेश गायकवाड यांनी केले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...

आ. दाते यांनी घेतली शेतकऱ्यांच्या मागणीची दखल! ‘या’ योजनेचा स्थानिक शेतकऱ्यांना फायदा होणार..

पारनेर । नगर सहयाद्री:- खडकवाडी गावातील शेतकऱ्यांनी पाझर तलावातील गाळ काढण्याची मागणी अनेक दिवसांपासून...