spot_img
ब्रेकिंगस्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत मोठी अपडेट; निवडणूक आयोगाकडून सरकारला....

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत मोठी अपडेट; निवडणूक आयोगाकडून सरकारला….

spot_img

राज्य निवडणूक आयोगाच्या प्रभाग रचनेबाबत सुचना
मुंबई | नगर सह्याद्री

राज्यातील रखडलेल्या महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांची प्रतीक्षा अखेर संपण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. राज्यात लवकरच निवडणुकीचा धुराळा उडणार असल्याचे संकेत आता मिळू लागले आहे. राज्य निवडणुक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आनुषंगाने तयारीला सुरवात देखील केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या चार आठवड्यांत अधिसूचना जारी करण्याच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने हालचाली सुरू केल्या असून, निवडणूक आयोगाकडून राज्य सरकारला प्रभाग रचनेसंबंधीत सूचना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे लकवरच स्थानिक स्वराज्य संस्थांचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे.

सर्वोच्च न्यायालयाने मागील महिन्यात स्पष्ट आदेश देत, राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांची 4 महिन्यांच्या आत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करावी आणि त्याआधी चार आठवड्यांत अधिसूचना जाहीर करावी, असे निर्देश दिले होते. त्यानुसार निवडणूक आयोगाने निवडणुका घेण्यासाठीच्या हालचालींना वेग आणला आहे. निवडणूक आयोगाने प्रभाग रचना पूर्ण करण्याची जबाबदारी राज्य सरकारवर    सोपवली आहे. प्रभाग रचनेची माहिती राज्य सरकारने निवडणूक आयोगाला दिल्यानंतर आरक्षण आणि मतदार याद्या अंतिम करण्याची पुढील प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची महत्वाची माहिती समोर आली आहे. प्रभाग रचनेची प्राथमिक प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात असून, याच आठवड्यात ती माहिती आयोगाकडे सादर होण्याची शक्यता आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

एसटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, महागाई भत्ता अन् अपघात विमा!

मुंबई / नगर सह्याद्री - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण घोषणा...

पाऊस अन पुरामुळे कहर! सर्वोतोपरी मदत करण्याचे पंतप्रधान मोदींचे आश्वासन….

नगर सह्याद्री बेव टीम : सध्या ईशान्येकडील भागात खूप विनाश झाला आहे. आसामपासून ते सिक्कीम,...

आमदार संग्राम जगताप यांनी घेतला टीकाकारांचा समाचार; किंमत नसणाऱ्यांना… , काय म्हणाले पहा

चाणक्य चौक आदर्श कॉलनी येथे रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ अहिल्यानगर| नगर सह्याद्री मध्यवर्ती शहरातील रस्त्यांची कामे...

गुन्हेगारांना सोडणार नाही ; एसपी सोमनाथ घार्गे नेमकं काय म्हणाले पहा

अहिल्यानगर| नगर सह्याद्री जिल्ह्यात सध्या गुन्हेगारीचे स्वरूप बदलले आहे. पोलिसांनी आता अधिक दक्ष राहण्याची गरज...