spot_img
ब्रेकिंगमोठी बातमी! मनोज जरांगे पाटील आता उपोषण करणार नाहीत; दसरा मेळाव्यात घेणार...

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील आता उपोषण करणार नाहीत; दसरा मेळाव्यात घेणार शपथ?

spot_img

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटलांचे गुरु बीडच्या नारायण गडाचे महंत शिवाजी महाराजांनी मोठे विधान केले आहे. जरांगे पाटील पुढच्या काळात उपोषण करणार नाहीत, असे मोठे संकेत महंत शिवाजी महाराजांनी दिले आहेत. जरांगे पाटलांचा दसरा मेळावा होणारी नारायण गडाची भूमि ही तपाची भूमी आहे. आणि उपोषण देखील एक तप आहे आणि याच तपाची सांगता करण्यासाठी पुढे उपोषण करणार नाही अशी प्रतिज्ञा घेण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे या नारायण गडाच्या तपाच्या भूमित येत आहेत. असे मोठे विधान महंत शिवाजी महाराजांनी केले आहे.

दसरा मेळाव्यासाठी मनोज जरांगे पाटलांनी नारायणगडच का निवडला? त्याचं कारण ही भूमी तपाची भूमी आहे, इथे साधू संतांनी तप केला आहे. नगद नारायण यांनी तपश्चर्या केली म्हणून पंढरपूरचा देव नारायणगडावर आले. तस आमच्या जरांगे पाटलांनी तप केला..उपोषण म्हणजे एक तप आहे आणि म्हणून या तपाची सांगता म्हणून इथ यायचं आणि या तपाची सांगता करायची, की इथून पुढे मी उपोषण करणार नाही. त्यामुळं ही प्रतिज्ञा करण्यासाठी मेळावा घेतला आणि यासाठी जरांगे पाटील येत आहेत. असं म्हणत महंत शिवाजी महाराजांनी मोठे विधान आणि संकेत दिले आहेत.

तत्पुर्वी मनोज जरांगे पाटील यांनी ज्या ज्या वेळी उपोषण सोडले, त्यावेळी महंत शिवाजी महाराजांच्या हाताने पाणी पिऊन त्यांनी उपोषण सोडल आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांचा शब्द म्हणजे जरांगे पाटलांसाठी शेवटचा शब्द आहे. त्यामुळे महंत शिवाजी महाराजांनी केलेले विधान चर्चेचा विषय ठरत आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या दसरा मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...

आ. दाते यांनी घेतली शेतकऱ्यांच्या मागणीची दखल! ‘या’ योजनेचा स्थानिक शेतकऱ्यांना फायदा होणार..

पारनेर । नगर सहयाद्री:- खडकवाडी गावातील शेतकऱ्यांनी पाझर तलावातील गाळ काढण्याची मागणी अनेक दिवसांपासून...