spot_img
राजकारणनिवडणुकांच्या तोंडावर मोठी बातमी ! केजरीवाल यांना कोर्टाचा झटका, अटकेला स्थगिती देण्यास...

निवडणुकांच्या तोंडावर मोठी बातमी ! केजरीवाल यांना कोर्टाचा झटका, अटकेला स्थगिती देण्यास नकार, पहा आज काय घडलं,,,

spot_img

नवी दिल्ली / नगर सह्याद्री : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मद्य धोरण प्रकरणात मनी लाँडिग घोटाळा आरोपात दिल्ली हायकोर्टाने सीएम केजरीवाल यांच्या याचिकेवर दोन आठवड्यात जबाब देण्यास सांगितले आहे. दिल्ली हायकोर्टात पुढची सुनावणी २२ एप्रिल रोजी होणार आहे.

आज मद्य धोरण प्रकरणात दिल्ली हायकोर्टात सुनावणी झाली. आज ईडीने कोर्टात कागदपत्रे जमा केली. ईडीकडून अतिरिक्त सॉलिसीटर एस व्ही राजू यांनी कोर्टात कागदपत्रे जमा केली, आणि म्हटले की, आम्ही कोर्टाच्या सांगण्यावरुन कागदपत्रे देत आहोत, याचिकाकर्ते याची मागणी करु नका.

सीएम केजरीवाल यांनी ईडीविरोधात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी झाली. केजरीवाल यांच्याकडून वकील अभिषेक सिंघवी उपस्थित होते, सिंघवी म्हणाले, लोकसभा निवडणुकीनंतर अटक करा, निवडणुका तरी लढवण्यासाठी वेळ द्या. तुम्हाला एवढेच समाधान मिळणार असेल तर जूनमध्ये अटक करा. कमीत कमी निवडणुका लढवण्यापर्यंत दंडात्मक कारवाईपासून सुरक्षा मिळाली पाहिजे, मला निवडणूक लढायला द्यायला पाहिजे, असंही केजरीवाल यांच्याकडून वकील सिंघवी म्हणाले.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणी ईडीने आता पर्यंत आठवेळा समन्स पाठवण्यात आले आहेत. केजरीवाल अजूनही चौकशीसाठी हजर झालेले नाही. दरम्यान, आप’कडून ईडीवर आरोप केले आहेत. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडी अटक करण्यात येणार असल्याचा आरोप आपने केला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मुलाच्या साक्षीने पित्याला लागली जन्मठेप; वाचा अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रकरण?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून पत्नीचा लाकडी दांड्याने निर्घृण...

आलमगीर शिवारात भयंकर प्रकार; जनावरे चारणाऱ्या महिलेसोबत घडलं असं काही..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर तालुक्यातील नागरदेवळे येथील आलमगीर शिवारात एका ४२ वर्षीय महिलेचा...

वन विभाग संभ्रमात; बिबट्याचा हल्ला आणि उंची यांचा काही संबंध असतो का?

नाशिक । नगर सहयाद्री:- बिबट्याचा वावर असलेल्या शहराजवळील लोहशिंगवे येथे शुक्रवारी सकाळी ३० वर्षाच्या...

दळणवळणाच्या दृष्टीने रस्त्यांचे महत्त्व अनमोल: आ. काशिनाथ दाते

२० लाख रुपयांचा पाडळी-कान्हुर रस्त्याचे भूमिपूजन पारनेर । नगर सहयाद्री:- रस्ते फक्त प्रवासाचे साधन नसून...