spot_img
ब्रेकिंगमोठी बातमी! नगर- कल्याण महामार्गावर अपघात, आठ ठार

मोठी बातमी! नगर- कल्याण महामार्गावर अपघात, आठ ठार

spot_img

पुणे। नगर सह्याद्री

नगर कल्याण महामार्गावर भीषण अपघात होऊन आठ जण जागीच मृत्युमुखी पडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हा अपघात रविवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडला आहे. मृतांमध्ये दोन मुले, एक महिला आणि पाच पुरुषांचा समावेश आहे.

रविवारी रात्री जुन्नर तालुक्यातील डिंगोरे गावा जवळील अंजीराची बाग येथे ओतूर वरुन कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या पिकअपने रिक्षा आणि ट्रकला जोरदार धडक दिली. यात पिकअप आणि रिक्षामधील आठ जणांचा जागीच मृत्यू झाला.

या अपघात पाच पुरुष, एक महिला आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे. गणेश मस्करे ( वय ३०), कोमल मस्करे ( वय २५ वर्ष ) हर्षद मस्करे (वय ४ वर्ष) काव्या मस्करे (वय ६ वर्ष) अशी मृतांची नावे आहेत. अन्य मृतांची नवे अद्याप समोर आली नसून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील कारवाई करण्याचे काम सुरू केले आहे.

पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; चार ठार

पुणे-नाशिक महामार्गावर चंदनापुरी शिवारात 8.30 वाजेच्या सुमारास टेम्पो कारवर कोसळल्याने चौघांचा मृत्यू झाला आहे.अतिशय भयंकर पद्धतीने घडलेल्या या घटनेत धावता आयशर टेम्पो बाजूने चाललेल्या कारच्या वर कोसळल्याने कारमधील चौघांचा मृत्यू झाला आहे.

मयतांमध्ये दोन पुरुष, एक महिला व 2 वर्षाच्या लहान बाळाचा समावेश आहे.सुनिल दिनकर धारणकर (वय 65, रा. सुभाष रोड, अकोले), आशा धारणकर (वय 42), ओजस्वी धारणकर (वय 2 वर्ष), अभय विसाळ (रा. अकोले) अशी मयतांची नावे आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार पारनेरला

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार पारनेरला पारनेर बाजार तळावर राष्ट्रवादीचे शक्ती प्रदर्शन पारनेर/प्रतिनिधी : पारनेर विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या...

कामगाराने लावला मालकाला साडेपाच लाखाला चुना? घडलं असे काही..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- नगर- दौंड रस्त्यावरील हनुमान नगर समोर असलेल्या एस. आर. कन्स्ट्रक्शनच्या साईटवरून...

महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरला?; शरद पवार यांचे सूचक विधान..

मुंबई | नगर सह्याद्री:- राज्यात पुढच्या महिन्यात विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. त्या अगोदर महायुतीने...

विधानसभेला महायुतीची वाढली डोकेदुखी; कारण काय?

पुणे | नगर सह्याद्री:- विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून सर्वच राजकीय पक्षाकडून बैठकांवर बैठका सुरू आहे....