spot_img
महाराष्ट्रसावधान! 'या' जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा, हवामान खात्याची माहिती वाचा एका क्लिकवर..

सावधान! ‘या’ जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा, हवामान खात्याची माहिती वाचा एका क्लिकवर..

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री
राज्यात सध्या उष्णतेच्या लाटेसह अवकाळी पावसाचा तडाखा सुरु आहे. गेल्या काही दिवसात तापमानात वाढ होत काही ठिकाणी तापमानाने ४३ अंशाचा टप्पा पार केला आहे. उष्णतेच्या लाटेसह अवकाळीचे संकट कायम आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवस कोकणामध्ये उष्ण आणि दमट हवामानाचा, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यातील नागरिक सध्या या वातावरणानुळे त्रस्त असताना आता पुन्हा तापमानात वाढ होत, उष्णतेच्या लाटेमुळे चिंता वाढली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यात २९ एप्रिलपर्यंत उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता आहे. ठाणे, मुंबईसह विदर्भात उष्णतेची लाट तीव्र असेल.

यासह अवकाळी पावसाचे संकट देखील कायम आहे. पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार, मराठवाड्यापासून उत्तर तमिळनाडूपर्यंत तसेच मध्य प्रदेशातील चक्राकार वाऱ्यांपासून विदर्भ, मराठवाडा आणि कर्नाटकपर्यंत हवेचे कमी दाबाचे पट्टे सक्रिय आहे. त्यामुळे विदर्भ आणि मराठा वाड्यात पावसाची शक्यता आहे.तर कोकणात पुढील दोन ते तीन दिवस वातावरण उष्ण व दमट राहणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पोलीस नागरिकांच्या संरक्षणासाठी की लुटण्यासाठी?; आमदार जगताप यांचा सवाल

अहिल्यानगर । नगर सहयाद्री: - शहरातील कोतवाली व तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीमध्ये चोऱ्या दरोडे महिलांच्या...

शहर विकासाच्या आड मनपाच्या टीपीची किड!

पालकमंत्री विखे पाटलांनी स्वतंत्र बैठक घेण्याची गरज | आ. जगताप यांच्या विरोधात जनमत तयार...

सत्ताधारी पुरोगामी मंडळाला मोठा धक्का! परिवर्तन मंडळाचा २१ जागांवर विजय..

अहिल्यानगर। नगर सहयाद्री:- माध्यमिक शिक्षक सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत स्वाभिमानी परिवर्तन मंडळाने २१ जागांवर मुसंडी...

कार्यकर्त्यांची फौज अन्‌‍ जीवाला जीव देणाऱ्या निष्ठावंतांचं केडर जपणारे ‘अरुणकाका’

सारिपाट / शिवाजी शिर्के नगरपालिकेचा नगराध्यक्ष म्हणून कामकाज पाहिलेल्या अरुणकाका जगताप यांनी पुढे जाऊन काही...