spot_img
अहमदनगरबनावट कागद पत्राद्वारे योजनेचा लाभ? 'कटके' अडकले जाळ्यात, 'असा' घडला प्रकार

बनावट कागद पत्राद्वारे योजनेचा लाभ? ‘कटके’ अडकले जाळ्यात, ‘असा’ घडला प्रकार

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री
बनावट मासिक वेतन पत्रिका तयार करून भारत सरकारच्या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेतल्याचा प्रकार नगरमध्ये उघडकीस आला आहे. याप्रकरणी गुरूवारी (दि. ७) सायंकाळी येथील तोफखाना पोलीस ठाण्यात दोघांविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अरूण संभाजी कटके व तुकेश अरूण कटके (दोघे रा. कटके मळा, जुना शिरसाठ वाडी रस्ता, पाथर्डी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी रोहित शिवाजी कदम (रा. कराड रस्ता, पंढरपुर, जि. सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. तुकेश कटके याने अरूण कटके याच्या मासिक वेतन पत्रिकेyत फेरफार करून बनावट पत्रिका तयार केली.

भारत सरकारच्या शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी ती पत्रिका येथील समाज कल्याण कार्यालयाला सादर केली. बनावट कागदपत्रांच्या आधारे सन २००५ ते २००७ मध्ये भारत सरकार शिष्यवृत्तीचा एकुण दोन हजार ११७ रूपयांचा लाभ घेऊन शासनाची फसवणूक केली. सदरचा प्रकार रोहित कदम यांनी येथील समाज कल्याण विभागाच्या निदर्शनास आणुन दिला.

त्यांनी कदम यांना १८ सप्टेंबर २०२३ रोजी पत्राव्दारे कळविले की, विद्यार्थ्याने तत्कालिन कालावधीत सक्षम अधिकारी यांच्या स्वाक्षरीचा उत्पन्नाचा दाखला महाविद्यालयास व महाविद्यालयाने ऑफलाइन अर्ज सर्व आवश्यक कागदपत्रांसह या कार्यालयास सादर केला आहे.

त्यानुसार या कार्यालयाकडून योजनेचा लाभ मंजूर केल्याचे दिसून येत आहे, असे उत्तर दिले. दरम्यान समाजकल्याण विभागाकडून पुढील कार्यवाहीस टाळाटाळ होत असल्याने कदम यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे अर्ज केला होता. अर्ज चौकशीनंतर गुरूवारी गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे अधिक तपास करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राखेतून फिनिक्ससारखी भरारी — माजी सैनिक नवनाथ खामकर यांचा संकल्प एस. मार्ट पुन्हा उभा

  श्रीगोंदा / नगर सह्याद्री - राखेतून पुन्हा जन्म घेणाऱ्या फिनिक्स पक्षासारखी किमया श्रीगोंद्यात पाहायला मिळाली...

स्थानिक स्वराज्य संस्थांनच्या निवडणुका संभाजी ब्रिगेड ताकदीने लढवणार – इंजी. शामभाऊ जरे

श्रीगोंदा / नगर सह्याद्री दिवाळीनंतर होणाऱ्या नगरपरिषद, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी संभाजी ब्रिगेड...

ओबीसी आरक्षण कमी झाल्याचा पुरावा आहे का? राधाकृष्ण विखे पाटील काय म्हणाले पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - ओबीसी आरक्षणावरून शुक्रवारपासून वातावरण पुन्हा तापले आहे. बीडमध्ये ओबीसी...

अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांना 846 कोटी 96 लाख रुपयांची मदत; पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

अहिल्यानगर | नगर सह्याद्री सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यातील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर...