spot_img
अहमदनगरअवकाळीचा जिल्ह्याला तडाखा! कुठे काय घडलं? पहा

अवकाळीचा जिल्ह्याला तडाखा! कुठे काय घडलं? पहा

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री-
जिल्ह्यातील काही भागात शुक्रवारी अनेक ठिकाणची झाडे उन्मळून पडली, तर पिकांचेही नुकसान झाले अहमदनगर शहर, कोपरगाव, पारनेर, अकोले आदी भागात वादळी वार्‍यासह पाऊस झाला. पावसाने उकाड्यापासून नागरिकांची सुटका झाली. जोरदार वार्‍यासह झालेल्या पावसामुळे चारा पिके जमिनदोस्त झाली. हवामान खात्याने जिल्ह्यात ९ हे १३ मे या कालावागत वादळी, वान्यासह पावसाचा इशारा दिला होता. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी नागरिक, शेतकन्यांना सतर्क राहण्याच्या सुचना दिल्या आहेत.

अकोले तालुयातील मुळा पट्ट्यात शुक्रवारी दुपारी वादळी पावसाने जोरदार हजेरी लावली. कोतूळ, वाघापूर, बोरी, धामणगाव पाट, अभीळ, मण्याडो, करंडी, ब्राह्मणवाडा परिसरांतील शेतीला अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसला.
या पावसाने अनेक ठिकाणी घरांचे व छपरांचे पत्रे उडाले. टोमॅटो व झेंडू, चारापिके यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आंबा उत्पादक शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले. या अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतक-यांनी केली आहे.

वीज पडून गाय दगावली
शुक्रवारी दुपारी संगमनेरातील पठार भागात अवकाळी पाऊस आला. त्यात पठार भागातील गारोळे पठार (कुरकुंडी) येथील मनोहर भाऊ भुतांबरे या शेतकयाची एक गाय वीज पडून दगावली. याचा तलाठी शेख यांनी पंचनामा केला. शेतातील बांधलेल्या एका गायीवर वीज पडल्याने ती मृत्युमुखी पडली.

अकोल्यात एकाचा मृत्यू; पारनेरमध्ये आठ शेळ्या ठार
शुक्रवारी जिल्ह्याच्या अनेक भागात वादळी वार्‍यासह पाऊस झाला. अकोले तालुक्यातील राजून येथे वीज कोसळून पंढरीनाथ जयवंत मुर्तडक (वय ७५) या शेतकर्‍याचा मृत्य झाला. जामखेड येथे वीज कोसळून बैल तर पारनेर तालुक्यातील पुणेवाडी येथे वीज कोसळून आठ शेळ्या ठार झाल्या. पारनेरमध्ये अनेक ठिकाणी वादळी वार्‍यासह पावसाने हजेरी लावली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आ. दातेंनी विधानसभेत मांडली शेतकऱ्यांची व्यथा; पारनेर तालुक्यात बोगस बियाणे विकणारे दलाल; ‘त्यांचा…’

पारनेर । नगर सहयाद्री:- आमदार काशिनाथ दाते यांनी शेतकऱ्यांच्या न्यायासाठी विधानसभेत औचित्याच्या मुद्याद्वारे भक्कमपणे...

मर्चंट्स बँकेला रिझर्व्ह बँकेकडून ‌’शेड्यूल्ड बँक‌’ दर्जा प्राप्त

विश्वासार्हता, कार्यक्षमता आणि व्यावसायिक विस्तारात वाढ होणार: हस्तीमल मुनोत अहिल्यानगर । नगर सहयाद्री अहिल्यानगरच्या आर्थिक क्षेत्रात...

भिंगार शहरासाठी आता स्वतंत्र नगरपालिका; जिल्हा नियोजन समितीतून मिळणार निधी

अहिल्यानगर । नगर सहयाद्री येथील भिंगार शहरासाठी स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याचा धोरणात्मक निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र...

निळवंडे ८२ तर जायकवाडी ७0 टक्के भरले; भंडारदरा धरणात किती पाणीसाठा?, वाचा सविस्तर

आहिल्यानगर । नगर सहयाद्री:- मराठवाड्यासाठी जीवनदायिनी असणाऱ्या जायकवाडी प्रकल्पाच्या नाथसागर धरणात पाणीसाठा वाढत आहे....