spot_img
महाराष्ट्रAtal Setu Mumbai : 2 तासांचा प्रवास अवघ्या 20 मिनिटांत ! टोल...

Atal Setu Mumbai : 2 तासांचा प्रवास अवघ्या 20 मिनिटांत ! टोल ७९ हजार.. अटल सेतूचे वैशिष्टये पाहून चक्रवाल

spot_img

नगर सह्याद्री / मुंबई : शिवडी न्हावाशेवा सागरी सेतू अर्थात अटल सेतू आता वाहतुकीसाठी सज्ज झाला आहे. अटल सेतूमुळे मुंबई ते नवी मुंबई शहरांना जोडणारा नवा पर्याय उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे या सेतूमुळे दोन ते अडीच तासांचा प्रवास २० मिनिटात होणार आहे. परंतु यासाठी टोलही तेवढाच जास्त असणार आहे. कार साठी सिंगल टोल हा २५० रुपये आहे.

* अटल सागरी सेतूची वैशिष्ट्ये –
देशातील सर्वात मोठा 22 किमी लांब सागरी सेतू
मुंबई ते नवी मुंबई 2 तासांचा प्रवास अवघ्या 20 मिनिटांत शक्य
मुंबईतून नवी मुंबई, पुणे, कोकणाकडे लवकर जाता येणार
अटल सेतूवर अत्याधुनिक वाहतूक नियंत्रण यंत्रणा कार्यान्वित
सागरी सेतूवर विविध प्रकारचे सुमारे 400 सीसीटीव्ही कॅमेरे
समुद्रातील लाटा आणि भूंकपाचा विचार करून सेतू तयार
शंभर वर्षांपर्यंत सागरी सेतू सुस्थितीत राहण्याचा अंदाज

* टोलची चर्चा
शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूवर कमीत कमी 250 रुपयांचा टोल आकारला जाणार आहे. या मार्गावर अवजड वाहनासाठी मासिक पास हा तब्बल 79000 रुपये इतका आहे. कार साठी सिंगल टोल हा 250 रुपये आहे. तर, कारसाठी मासिक पास हा 12 हजार रुपयांचा असणार आहे. तर, अवजड वाहनासाठी सिंगल टोल 1580 रुपये तर, मासिक पास काढायला असल्यास तब्बल 79 हजार रुपये मोजावे लागणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पोलीस नागरिकांच्या संरक्षणासाठी की लुटण्यासाठी?; आमदार जगताप यांचा सवाल

अहिल्यानगर । नगर सहयाद्री: - शहरातील कोतवाली व तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीमध्ये चोऱ्या दरोडे महिलांच्या...

शहर विकासाच्या आड मनपाच्या टीपीची किड!

पालकमंत्री विखे पाटलांनी स्वतंत्र बैठक घेण्याची गरज | आ. जगताप यांच्या विरोधात जनमत तयार...

सत्ताधारी पुरोगामी मंडळाला मोठा धक्का! परिवर्तन मंडळाचा २१ जागांवर विजय..

अहिल्यानगर। नगर सहयाद्री:- माध्यमिक शिक्षक सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत स्वाभिमानी परिवर्तन मंडळाने २१ जागांवर मुसंडी...

कार्यकर्त्यांची फौज अन्‌‍ जीवाला जीव देणाऱ्या निष्ठावंतांचं केडर जपणारे ‘अरुणकाका’

सारिपाट / शिवाजी शिर्के नगरपालिकेचा नगराध्यक्ष म्हणून कामकाज पाहिलेल्या अरुणकाका जगताप यांनी पुढे जाऊन काही...