spot_img
महाराष्ट्रAtal Setu Mumbai : 2 तासांचा प्रवास अवघ्या 20 मिनिटांत ! टोल...

Atal Setu Mumbai : 2 तासांचा प्रवास अवघ्या 20 मिनिटांत ! टोल ७९ हजार.. अटल सेतूचे वैशिष्टये पाहून चक्रवाल

spot_img

नगर सह्याद्री / मुंबई : शिवडी न्हावाशेवा सागरी सेतू अर्थात अटल सेतू आता वाहतुकीसाठी सज्ज झाला आहे. अटल सेतूमुळे मुंबई ते नवी मुंबई शहरांना जोडणारा नवा पर्याय उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे या सेतूमुळे दोन ते अडीच तासांचा प्रवास २० मिनिटात होणार आहे. परंतु यासाठी टोलही तेवढाच जास्त असणार आहे. कार साठी सिंगल टोल हा २५० रुपये आहे.

* अटल सागरी सेतूची वैशिष्ट्ये –
देशातील सर्वात मोठा 22 किमी लांब सागरी सेतू
मुंबई ते नवी मुंबई 2 तासांचा प्रवास अवघ्या 20 मिनिटांत शक्य
मुंबईतून नवी मुंबई, पुणे, कोकणाकडे लवकर जाता येणार
अटल सेतूवर अत्याधुनिक वाहतूक नियंत्रण यंत्रणा कार्यान्वित
सागरी सेतूवर विविध प्रकारचे सुमारे 400 सीसीटीव्ही कॅमेरे
समुद्रातील लाटा आणि भूंकपाचा विचार करून सेतू तयार
शंभर वर्षांपर्यंत सागरी सेतू सुस्थितीत राहण्याचा अंदाज

* टोलची चर्चा
शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूवर कमीत कमी 250 रुपयांचा टोल आकारला जाणार आहे. या मार्गावर अवजड वाहनासाठी मासिक पास हा तब्बल 79000 रुपये इतका आहे. कार साठी सिंगल टोल हा 250 रुपये आहे. तर, कारसाठी मासिक पास हा 12 हजार रुपयांचा असणार आहे. तर, अवजड वाहनासाठी सिंगल टोल 1580 रुपये तर, मासिक पास काढायला असल्यास तब्बल 79 हजार रुपये मोजावे लागणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आजचे राशी भविष्य ! ‘या’ राशीतील जातकांना लाभदायक ‘गुरुवार’

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य खूप अल्पसे अडथळे येतील-परंतु दिवसभरात खूप काही यश...

नगर शहरातील तीन समाजकंटक हद्दपार; वाचा नगर क्राईम

​अहिल्यानगर । नगर सह्याद्री ​अहिल्यानगर शहरात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी कोतवाली...

जिल्हा बँक सोनेतारण व्यवसाय वाढवणार : चेअरमन चंद्रशेखर घुले

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सोनेतारण व्यवसायात वाढ करणार...

सामूहिक आत्महत्येने नाशिक हादरले, ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने २ मुलांसह विहिरीत मारली उडी

नाशिक / नगर सह्याद्री - नाशिकमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने दोन मुलांसह सामूहिक आत्महत्या केल्याची घटना...