spot_img
ब्रेकिंगPolitics News: विधानसभेचे बिगुल वाजणार! आचारसंहिता कधी लागणार? मोठी माहिती आली समोर..

Politics News: विधानसभेचे बिगुल वाजणार! आचारसंहिता कधी लागणार? मोठी माहिती आली समोर..

spot_img

Politics News: विधानसभेचे बिगुल लवकरच वाजणार असून सर्वच पक्षानी निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. महायुतीमध्ये जागा वाटपावरुन रस्सीखेच सुरू आहे तर महाविकास आघाडीने आपली रणनीती आखण्यास सुरवात केली आहे. अशातच एक मोठीये अपडेट समोर आली आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी आय़ुक्त राजीव कुमार यांच्या नेतृत्वात १४ जणांचे पथक दाखल झाले असून महाराष्ट्रात १५ ते १७ नोव्हेंबर दरम्यान मतदान आणि २० नोव्हेंबरपर्यंत निकाल असा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाचे पथक आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २६ ते २८ सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज २७ सप्टेंबरला सकाळी १० वाजता सर्व राजकीय पक्षांसोबत बैठक होणार आहे. तर २८ सप्टेंबर रोजी शनिवारी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि सर्व जिल्ह्यातील पोलिस आयुक्त, पोलिस अधिक्षक यांच्यासोबत बैठक आयोजिक करण्यात आली आहे. त्यानंतर शनिवारी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे. शनिवारी होणाऱ्या पत्रकार परिषदेत विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान सर्वत्र विधानसभा निवडणूक कधी होणार? आचारसंहिता कधी लागणार? याबाबत उलट सुलट चर्चा ऐकण्यास मिळत आहे. काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी राज्यात दोन टप्प्यात निवडणुका होतील, असा अंदाज वर्तवला होता. काही तज्ज्ञांच्या मते राज्यात विधानसभा निवडणुका एकाच टप्प्यात होतील.२८८ विधानसभा मतदारसंघातील निवडणुका दोन टप्प्यात घेण्याचं ठरवल्यास १३ नोव्हेंबर आणि १६ नोव्हेंबर या दोन टप्प्यात मतदान होण्याची शक्यता आहे. तर २० नोव्हेंबर रोजी निवडणुकीच्या निकाल लागू शकतो. एकाच टप्प्यात निवडणुका घ्यावयाचे ठरल्यास १६ नोव्हेंबर रोजी मतदान होऊ शकते. तर २० नोव्हेंबर रोजी निकाल लागू शकतो अशी शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पालकमंत्री सरसावले अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीला ; प्रशासनाला दिले असे आदेश

अतिवृष्टीने बाधित व्यक्तींना तातडीने मदत उपलब्ध करून द्या : पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील...

पुढचे २४ तास अलर्ट राहा! या जिल्ह्यांत अतिमुसळधार पाऊस

मुंबई / नगर सह्याद्री राज्यात कालपासून परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. कालपासून महाराष्ट्रात अनेक...

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून पवार आक्रमक; देवभाऊंवर साधला निशाणा, म्हणाले आता आम्ही…

नाशिक / नगर सह्याद्री गेल्या दोन महिन्यांत महाराष्ट्रात २,००० हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या...

खासदार निलेश लंके धावले अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीला; काय केले पहा

खा. नीलेश लंके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन अहिल्यानगर / नगर सह्याद्री - गेल्या तीन ते...