spot_img
अहमदनगरएकूलता एक मुलगा गेल्याचे समजताच आई वडिलांनी हंबरडा फोडला! शाळकरी मुलासोबत नेमकं...

एकूलता एक मुलगा गेल्याचे समजताच आई वडिलांनी हंबरडा फोडला! शाळकरी मुलासोबत नेमकं घडलं काय?

spot_img

श्रीगोंदा । नगर सहयाद्री
श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी मधील रेल्वे लाईनच्या शेजारी खोदलेल्या अनधिकृत शेततळ्यात बुडून शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. समीर अंकुश बरकडे (वय १३, रा. निमगाव खलु, ता. श्रीगोंदा ) असे मृत मुलाचे नाव आहे.

अधीक माहिती अशी: समीर इयत्ता आठवीत शिक्षण घेतो.सोमवार दि.१ एप्रिल रोजी दुपारी शाळा सुटल्यावर समीर आणि आणि त्याचा मित्र दोघे पोहायला गेले. समीरने पाण्यात उडी मारली परंतु उडी मारल्यानंतर तो चिखलात रुतुन बसल्याने तो बाहेर निघेनासा झाला. सोबत असलेल्या मित्राने अनेकांना हातवारे करुण इशारे करत समीर बुडल्याचे सांगितले.

केलेले हातवारे खुना समजावल्यानंतर सर्वांनी शेततळ्याकडे धाव घेत पाण्यात उड्या मारुन शोध घेतला असता समीर चिखलात रुतलेल्या अवस्थेत सापडला. मृतदेह बाहेर काढून श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आला. आई वडिलांना एकूलता एक मुलगा गेल्याचे समजताच दोघांनी हंबरडा फोडला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

महाराष्ट्रावर दुहेरी संकट! 3 जिल्ह्यांना उष्णतेचा इशारा तर ‘या’ सात जिल्ह्यांत अवकाळी पाऊस बरसणार

Maharashtra Weather: राज्यात हवामानाने अचानक कलाटणी घेतली असून काही जिल्ह्यांत उष्णतेची लाट तर काही...

अहिल्यानगर: महिला वनरक्षकावर हल्ला; फॉरेस्ट परिसरात काय घडलं?, धक्कादायक कारण समोर…

Crime News : देहरे (ता. अहिल्यानगर) येथील वन (फॉरेस्ट) विभागाच्या परीक्षेत्रातील सर्वे नंबर 171...

आजचे राशी भविष्य! तुमच्या नशिबात काय?, वाचा सविस्तर

मुंबई। नगर सहयाद्री:- मेष राशी भविष्य आजचा दिवस तुमच्यासाठी सक्रिय ऊर्जेचा उभारी देणारा नाही आणि तुम्ही...

भाविकांसाठी खुशखबर.! चार धाम यात्रेबाबत मोठी अपडेट

नवी दिल्ली / वृत्तसंस्था : ३० एप्रिलपासून सुरू होणाऱ्या चार धाम यात्रेची तयारी जोरात सुरू...