spot_img
अहमदनगरएकूलता एक मुलगा गेल्याचे समजताच आई वडिलांनी हंबरडा फोडला! शाळकरी मुलासोबत नेमकं...

एकूलता एक मुलगा गेल्याचे समजताच आई वडिलांनी हंबरडा फोडला! शाळकरी मुलासोबत नेमकं घडलं काय?

spot_img

श्रीगोंदा । नगर सहयाद्री
श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी मधील रेल्वे लाईनच्या शेजारी खोदलेल्या अनधिकृत शेततळ्यात बुडून शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. समीर अंकुश बरकडे (वय १३, रा. निमगाव खलु, ता. श्रीगोंदा ) असे मृत मुलाचे नाव आहे.

अधीक माहिती अशी: समीर इयत्ता आठवीत शिक्षण घेतो.सोमवार दि.१ एप्रिल रोजी दुपारी शाळा सुटल्यावर समीर आणि आणि त्याचा मित्र दोघे पोहायला गेले. समीरने पाण्यात उडी मारली परंतु उडी मारल्यानंतर तो चिखलात रुतुन बसल्याने तो बाहेर निघेनासा झाला. सोबत असलेल्या मित्राने अनेकांना हातवारे करुण इशारे करत समीर बुडल्याचे सांगितले.

केलेले हातवारे खुना समजावल्यानंतर सर्वांनी शेततळ्याकडे धाव घेत पाण्यात उड्या मारुन शोध घेतला असता समीर चिखलात रुतलेल्या अवस्थेत सापडला. मृतदेह बाहेर काढून श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आला. आई वडिलांना एकूलता एक मुलगा गेल्याचे समजताच दोघांनी हंबरडा फोडला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...