spot_img
अहमदनगरएकूलता एक मुलगा गेल्याचे समजताच आई वडिलांनी हंबरडा फोडला! शाळकरी मुलासोबत नेमकं...

एकूलता एक मुलगा गेल्याचे समजताच आई वडिलांनी हंबरडा फोडला! शाळकरी मुलासोबत नेमकं घडलं काय?

spot_img

श्रीगोंदा । नगर सहयाद्री
श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी मधील रेल्वे लाईनच्या शेजारी खोदलेल्या अनधिकृत शेततळ्यात बुडून शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. समीर अंकुश बरकडे (वय १३, रा. निमगाव खलु, ता. श्रीगोंदा ) असे मृत मुलाचे नाव आहे.

अधीक माहिती अशी: समीर इयत्ता आठवीत शिक्षण घेतो.सोमवार दि.१ एप्रिल रोजी दुपारी शाळा सुटल्यावर समीर आणि आणि त्याचा मित्र दोघे पोहायला गेले. समीरने पाण्यात उडी मारली परंतु उडी मारल्यानंतर तो चिखलात रुतुन बसल्याने तो बाहेर निघेनासा झाला. सोबत असलेल्या मित्राने अनेकांना हातवारे करुण इशारे करत समीर बुडल्याचे सांगितले.

केलेले हातवारे खुना समजावल्यानंतर सर्वांनी शेततळ्याकडे धाव घेत पाण्यात उड्या मारुन शोध घेतला असता समीर चिखलात रुतलेल्या अवस्थेत सापडला. मृतदेह बाहेर काढून श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आला. आई वडिलांना एकूलता एक मुलगा गेल्याचे समजताच दोघांनी हंबरडा फोडला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी… नवाब मलिक यांना कोर्टाचा मोठा दणका… दाऊदच्या मालमत्ता प्रकरणात नेमकं काय घडलं?

मुंबई / नगर सह्याद्री - राष्ट्रवादी नेते नवाब मलिक यांना मुंबई सत्र न्यायालय विशेष...

शहाजी बापू संतापले; ‘भाजपचे राजकारण हिडीस अन् अबलेवर बलात्कार केल्यासारखे..’ नेमकं काय म्हणाले?

मुंबई / नगर सह्याद्री - आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्ष...

पालक, शिक्षकांना मोबाइलच्या तोट्यांची माहिती देणार : मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी

जिल्हा परिषद व ‘ऋणानुबंध’च्या संयुक्त विद्यमाने मोबाइलवर कार्यशाळा अहिल्यानगर | नगर सह्याद्री विद्यार्थ्यांना मोबाईलपासून दूर ठेवण्यासाठी...

आश्रमशाळेच्या नावाखाली २ कोटी ४८ लाखांचा डल्ला; नगरमधील प्रकार

सद्गुरू रोहिदासजी संस्थेच्या अध्यक्षासह सात पदाधिकार्‍यांवर फसवणुकीचा गुन्हा अहिल्यानगर | नगर सह्याद्री  केंद्र शासनाकडून आश्रमशाळेसाठी मिळालेल्या...