spot_img
अहमदनगरएकूलता एक मुलगा गेल्याचे समजताच आई वडिलांनी हंबरडा फोडला! शाळकरी मुलासोबत नेमकं...

एकूलता एक मुलगा गेल्याचे समजताच आई वडिलांनी हंबरडा फोडला! शाळकरी मुलासोबत नेमकं घडलं काय?

spot_img

श्रीगोंदा । नगर सहयाद्री
श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी मधील रेल्वे लाईनच्या शेजारी खोदलेल्या अनधिकृत शेततळ्यात बुडून शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. समीर अंकुश बरकडे (वय १३, रा. निमगाव खलु, ता. श्रीगोंदा ) असे मृत मुलाचे नाव आहे.

अधीक माहिती अशी: समीर इयत्ता आठवीत शिक्षण घेतो.सोमवार दि.१ एप्रिल रोजी दुपारी शाळा सुटल्यावर समीर आणि आणि त्याचा मित्र दोघे पोहायला गेले. समीरने पाण्यात उडी मारली परंतु उडी मारल्यानंतर तो चिखलात रुतुन बसल्याने तो बाहेर निघेनासा झाला. सोबत असलेल्या मित्राने अनेकांना हातवारे करुण इशारे करत समीर बुडल्याचे सांगितले.

केलेले हातवारे खुना समजावल्यानंतर सर्वांनी शेततळ्याकडे धाव घेत पाण्यात उड्या मारुन शोध घेतला असता समीर चिखलात रुतलेल्या अवस्थेत सापडला. मृतदेह बाहेर काढून श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आला. आई वडिलांना एकूलता एक मुलगा गेल्याचे समजताच दोघांनी हंबरडा फोडला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर! महत्वाचे कारण आले समोर, वाचा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था -  मागील चार ते पाच वर्षांपासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या...

आधी पाप केलं, आता सल्ले देऊ नका!, निवृत्ती घ्या!; शरद पवार यांच्या टीकेला मंत्री विखे पाटलांचे प्रतिउत्तर

नाशिक । नगर सहयाद्री राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या वतीने नाशिक येथे भव्य शेतकरी...

बाजारात पोहचण्याआधीच संकट; पिकअपच्या अपघाताने हादरले ‘अहिल्यानगर’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील आठवडे बाजारासाठी जात असताना सोमवारी (१५ सप्टेंबर) दुपारी साडेतीन...

दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना खुशखबर! सरकारचा मोठा निर्णय?, समोर आली अपडेट

मुंबई ।नगर सहयाद्री:- भारत हा कृषीप्रधान देश असून कोट्यवधी शेतकरी आपल्या उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून आहेत....