जालना / नगर सह्याद्री : सर्वांचे लक्ष लागून असलेलं अधिवेशन आज पार पडलं. या अधिवेशनात
मराठा आरक्षण विधेयक विधानसभेत मंजूर झालं आहे. यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. दिलेल्या आरक्षणाचं स्वागत आहे.
पण हे आरक्षण आम्हाला मान्य नाही, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. उद्या जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाबाबतची बैठक बोलावली आहे. सगळ्या मराठा बांधवांनी अंतरवली सराटीमध्ये या आंदोलनाची पुढची दिशा ठरवूयात, असं आवाहन मनोज जरांगे पाटील म्हणालेत.
मनोज जरांगे काय म्हणाले?
आम्ही इथून आधीही स्वागत केलं होतं. आताही स्वागत करतो. आमचं म्हणणं आहे. आमच्या हक्काचं आरक्षण द्या. सगे सोयरेची अंमलबजावणी करा ही आमची मागणी आहे. जे पाहिजे ते आम्ही मिळवणारच आहोत. आधीही सांगितलं होतं की हे नाकारण्याचा काही कारणच नाही, असं मनोज जरांगे पाटील म्हणालेत.