spot_img
अहमदनगरAhmadnagar Breaking: धरपकड, छापेमारी! शेकडो ग्रामस्थ परागंदा, 'या' गावात खळबळ, नेमकं प्रकरण...

Ahmadnagar Breaking: धरपकड, छापेमारी! शेकडो ग्रामस्थ परागंदा, ‘या’ गावात खळबळ, नेमकं प्रकरण काय?

spot_img

राहाता। नगर सहयाद्री-

नगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील निर्मळ पिंप्री गावात एकच खळबळ उडाली आहे. दोन कटूंबावर जमावाने केलेल्या हल्ल्याप्रकरणी आरोपींच्या शोधासाठी छापेमारी करत धरपकड सुरू केली असता शेकडो ग्रामस्थ गाव सोडून परागंदा झाले आहे.

बुधवारी रात्रीच्या सुमारास नगर-मनमाड रस्त्याच्या कडेला असलेल्या अस्तगाव शिवारात राहणाऱ्या दोन दलित कुटुंबांना ४०० ते ५०० जणांच्या जमावाने मारहाण करत घरांची तोडफोड, जाळपोळ करून घरासमोर लावलेल्या वाहनांचे नुकसान केले होते.

याप्रकरणी गावातील ७१ जणांविरुद्ध ‘अ‍ॅट्रासिटी’सह मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेला तीन दिवस होऊनही आरोपीना अटक न झाल्याने याबद्दल सर्वत्र निषेध सुरू झालेला होता.

दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी कारवाई सुरु करताच निर्मळ पिंप्री गावातून शेकडो ग्रामस्थ परागंदा झाले असून याप्रकरणी तीन आरोपींनाअटक करण्यात आली असून उर्वरित आरोपींच्या शोधासाठी छापेमारी सुरू आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

माजी नगरसेवक अमोल येवलेसह 12 जणांवर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- केडगाव येथील 132 केव्ही महावितरण उपकेंद्रात शासकीय कामकाजादरम्यान अतिरिक्त कार्यकारी अभियंता...

मुख्यालयातील पोलीस अंमलदार झाले बेपत्ता

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- येथील पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले पोलीस अंमलदार बेपत्ता झाले आहेत....

नगरमधील तीन युवकांचा मृत्यू; तिरुपतीवरुन परत येतांना नेमकं काय घडलं?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री :- अहिल्यानगर जिल्हयातील शेवगाव येथील युवकांच्या अपघताचे वृत्त समोर आले...

आमदार संजय गायकवाडांचा राडा; कँटिन ऑपरेटरला लाथा-बुक्क्‌‍यांनी मारहाण, कारण काय?

मुंबई । नगर सहयाद्री वादग्रस्त वक्तव्यांमुळे सातत्याने चर्चेत राहणारे शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड...