spot_img
अहमदनगरAhmadnagar Breaking: धरपकड, छापेमारी! शेकडो ग्रामस्थ परागंदा, 'या' गावात खळबळ, नेमकं प्रकरण...

Ahmadnagar Breaking: धरपकड, छापेमारी! शेकडो ग्रामस्थ परागंदा, ‘या’ गावात खळबळ, नेमकं प्रकरण काय?

spot_img

राहाता। नगर सहयाद्री-

नगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील निर्मळ पिंप्री गावात एकच खळबळ उडाली आहे. दोन कटूंबावर जमावाने केलेल्या हल्ल्याप्रकरणी आरोपींच्या शोधासाठी छापेमारी करत धरपकड सुरू केली असता शेकडो ग्रामस्थ गाव सोडून परागंदा झाले आहे.

बुधवारी रात्रीच्या सुमारास नगर-मनमाड रस्त्याच्या कडेला असलेल्या अस्तगाव शिवारात राहणाऱ्या दोन दलित कुटुंबांना ४०० ते ५०० जणांच्या जमावाने मारहाण करत घरांची तोडफोड, जाळपोळ करून घरासमोर लावलेल्या वाहनांचे नुकसान केले होते.

याप्रकरणी गावातील ७१ जणांविरुद्ध ‘अ‍ॅट्रासिटी’सह मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेला तीन दिवस होऊनही आरोपीना अटक न झाल्याने याबद्दल सर्वत्र निषेध सुरू झालेला होता.

दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी कारवाई सुरु करताच निर्मळ पिंप्री गावातून शेकडो ग्रामस्थ परागंदा झाले असून याप्रकरणी तीन आरोपींनाअटक करण्यात आली असून उर्वरित आरोपींच्या शोधासाठी छापेमारी सुरू आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर! महत्वाचे कारण आले समोर, वाचा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था -  मागील चार ते पाच वर्षांपासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या...

आधी पाप केलं, आता सल्ले देऊ नका!, निवृत्ती घ्या!; शरद पवार यांच्या टीकेला मंत्री विखे पाटलांचे प्रतिउत्तर

नाशिक । नगर सहयाद्री राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या वतीने नाशिक येथे भव्य शेतकरी...

बाजारात पोहचण्याआधीच संकट; पिकअपच्या अपघाताने हादरले ‘अहिल्यानगर’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील आठवडे बाजारासाठी जात असताना सोमवारी (१५ सप्टेंबर) दुपारी साडेतीन...

दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना खुशखबर! सरकारचा मोठा निर्णय?, समोर आली अपडेट

मुंबई ।नगर सहयाद्री:- भारत हा कृषीप्रधान देश असून कोट्यवधी शेतकरी आपल्या उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून आहेत....