spot_img
आरोग्यचेहऱ्याची काळजी घेताना तुम्ही 'ह्या' 4 चुका तर करत नाही ना? त्वचेचे...

चेहऱ्याची काळजी घेताना तुम्ही ‘ह्या’ 4 चुका तर करत नाही ना? त्वचेचे होईल जास्त नुकसान

spot_img

नगर सह्याद्री टीम : कोरडी त्वचा ही एक सामान्य समस्या आहे, या स्थितीत त्वचेतील आर्द्रतेचे प्रमाण कमी होते, ज्याचा पातळ थर सोलून बाहेर पडू लागतो. जे हात, पाय आणि चेहऱ्याच्या त्वचेवर सहज दिसू शकतात. काही लोकांची त्वचा नेहमीच कोरडी असते तर काही लोकांच्या त्वचेत कोरडेपणा फक्त थंडीच्या काळात जाणवतो. आज आपण अशाच 3 चुका जाणून घेणार आहोत ज्या लोक आपल्या त्वचेची काळजी घेताना करतात.

* पाणी आणि दुधाचा योग्य प्रमाणात वापर करा: त्वचेचा जास्त कोरडेपणा शरीरात पाण्याची कमतरता आणि त्वचेमध्ये तेलाची कमतरता दर्शवते. आपल्या त्वचेच्या छिद्रांच्या मुळांमध्ये तेल सोडणारी ग्रंथी असते, जी आपल्या त्वचेला कोरडे होण्यापासून वाचवण्यासाठी तेल सोडत राहते. तेल याठिकाणी बनत राहणे फार महत्वाचे आहे. यासाठी दूध हा सर्वात आरोग्यदायी आणि उत्तम पर्याय आहे कारण दुधामध्ये अनेक एन्झाइम्स आणि हार्मोन्स असतात जे त्वचेतील तेल उत्पादन वाढवण्यास खूप मदत करतात.

* साबणाचा चुकीचा वापर किंवा फेस वॉशची चुकीची पद्धत: बहुतेक साबण सोडियम आणि चरबीने बनलेले असतात. त्यामुळे त्यात अल्कधर्मी गुणधर्म असतात. जे आपल्या त्वचेच्या अम्लीय गुणधर्माच्या अगदी विरुद्ध आहे, त्यामुळे त्याच्या वापरानंतर आपली त्वचा अधिक कोरडी होते. त्यामुळे कोरडी त्वचा असणाऱ्यांनी आपल्या शरीरासाठी लिक्विड बॉडी वॉश किंवा मॉइश्चरायझिंग बॉडी शॉप वापरावे. पण चेहऱ्यासाठी नेहमी सौम्य क्लिंजर वापरा. जे क्रीम स्वरूपात येते.

* गरम आणि थंड पाणी: काही लोक उन्हाळ्यात खूप थंड पाणी आणि हिवाळ्यात खूप गरम पाणी आंघोळीसाठी वापरतात. वास्तविक खूप थंड पाणी आपल्या त्वचेतील आर्द्रता शोषून घेते आणि खूप गरम पाणी त्वचेतील आर्द्रतेचे वाष्पीकरण करते. त्यामुळे त्वचा आणखी कोरडी होते.

* बराच वेळ चेहरा धुणे किंवा आंघोळ करणे : काही लोकांना जास्त वेळ चेहरा धुणे किंवा आंघोळ करणे आवडते. कारण तुम्ही जितका वेळ आंघोळ कराल किंवा चेहरा धुता तितके त्वचेतील नैसर्गिक तेल बाहेर पडते. त्यामुळे त्वचेतील कोरडेपणा आणखी वाढतो. म्हणून, आंघोळीसाठी 5 ते 10 मिनिटांपेक्षा जास्त किंवा चेहरा धुण्यासाठी 1 ते 2 मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागू नये.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ठाकरे की शिंदे? धनुष्यबाण कोणाच्या हाती येणार? सुप्रीम कोर्टात आज काय घडलं?

मुंबई । नगर सहयाद्री:- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होताच, शिवसेना पक्षाच्या नावावरून...

साहेब! सांगा कचरा टाकू कुठे? ‘या’ भागातील महिलांचा सवाल, वाचा आयुक्त डांगे यांचे उत्तर..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर महानगरपालिकेच्या कचरा संकलन व्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाला असून शहरातील...

खळबळजनक आरोप: ‘आरएसएसच्या बैठकीत संभाजी ब्रिगेडला संपवण्याची योजना’

प्रवीण गायकवाड यांचा दीपक काटेला तुरुंगात सुविधा पुरवणार असल्याचा आरोप मुंबई । नगर सहयाद्री:- गेल्या...

नगरमधून अपहरण, आळंदीत अत्याचार; वारकरी शिक्षण संस्थेत चाललंय काय? महिला कीर्तनकारासह..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री पुण्याच्या आळंदी येथे धक्कादाय प्रकार उघडकीस आला असून अहिल्यानगर येथून...