spot_img
अहमदनगरपुन्हा एक 'सैराट'! मुलीच्या नातेवाईकांनी मुलाला संपवल; 'धक्कादायक' घटनेनं शहर हादरलं

पुन्हा एक ‘सैराट’! मुलीच्या नातेवाईकांनी मुलाला संपवल; ‘धक्कादायक’ घटनेनं शहर हादरलं

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री:-
जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आंतरजातीय विवाहाला विरोध करत मुलीच्या घरच्यांनी मुलीच्या पतीची निर्घृण हत्या केल्याचा
प्रकार पारनेर तालुक्यात घडला आहे. याप्रकरणी काही आरोपींना अटकही करण्यात आली असून तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

अधिक माहिती अशी: तालुक्यातील एका गावात एकमेकांच्या शेजारी राहात असलेल्या आंतरजातीय तरुण मुलाचे आणि शेजारील मुलीचे प्रेम होते. हे प्रेम आंतरजातीय असल्याने दोघांच्या कुटुंबीयांचा विरोध होणार, हे त्यांना माहित होते. मात्र, प्रेमाला जात नसते. त्यामुळे त्यांनी दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन लग्न केले आणि तेथे सुखी संसार करू लागले. पण मुलीच्या कुटुंबीयांना हे मान्य नसल्याने त्यांना ते सतत खटकत होते.

शेवटी मुलीच्या कुटुंबीयांनी घरातील भांडण मिटवण्याच्या बहाण्याने मुलास बोलावून घेऊन त्याचा खून केला. इतकेच नव्हे तर, त्याचा मृतदेह पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने जाळूनही टाकला. आरोपींना अटक केल्याचे वृत्त समजले आहे. या घटनेने तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणामुळे हकनाक तरुणाचा जीव गेला आहे.

समाज आज प्रगत झाल्याच्या गप्पा मारतो, प्रगतीचा आव आणतो, परंतु आजही समाजातील जातीय व्यवस्था संपलेली नाही हेच वास्तव असल्याचे या घटनेतून दिसते. या खून प्रकरणामुळे मुलीचा सुखी संसार मोडला आणि ज्यांनी हे कृत्य केले त्यांनाही अटक झाली. शेवटी, दोन्ही कुटुंबे उद्ध्वस्त होत आज उघड्यावर आल्याचे चित्र आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...