spot_img
आर्थिकJio ने दिला आणखी एक झटका? कंपनीने 'ते' रिचार्ज प्लान केले बंद!

Jio ने दिला आणखी एक झटका? कंपनीने ‘ते’ रिचार्ज प्लान केले बंद!

spot_img

Jio Recharge:जिओ वापरकर्त्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जिओने आपले सर्वात स्वस्त असलेले दोन प्लान बंद केले आहेत, ज्यामुळे युजर्सच्या खिशाला फटका बसणार आहे. जिओ कंपनीने अलीकडेच आपल्या रिचार्ज प्लानमध्ये वाढ केली आहे, ज्यामुळे युजर्सच्या खर्चात मोठी वाढ झाली आहे.

३ जुलै २०२४ पासून रिलायन्स जिओ आपल्या मोबाईल रिचार्जच्या किंमतीत वाढ करणार आहे. याचसोबत, जिओ कंपनी आपल्या सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान बंद करणार आहे. कंपनी ३९५ रुपये आणि ५९९ रुपयांचे रिचार्ज प्लान बंद करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या रिचार्ज प्लानमध्ये अनलिमिटेड डेटा उपलब्ध होता.

जिओचे हे दोन्ही प्लान अनलिमिटेड डेटासह उपलब्ध होते. ३९५ रुपयांचा प्लान ८४ दिवसांचा होता, तर ५९९ रुपयांच्या प्लानमध्ये ३३६ दिवसांची वैधता होती. जिओचे हे रिचार्ज प्लान सर्वाधिक लोकप्रिय होते. अनेक लोक हाच रिचार्ज करायचे. परंतु आता हा रिचार्ज प्लान बंद होणार आहे. जिओच्या या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला फटका बसणार आहे. देशभरात सर्वाधिक लोक जिओ सिम कार्डचा वापर करतात, परंतु जिओच्या या निर्णयामुळे त्यांना चांगला फटका बसला आहे.

युजर्स अजूनही प्रीपेड प्लान रिचार्ज करू शकतात, परंतु ३९५ आणि ५९९ रुपयांचे रिचार्ज उपलब्ध नाहीत. आता जुन्या प्लानमधील फक्त १५५ रुपयांचा प्लान उपलब्ध आहे, परंतु या रिचार्ज प्लानमधील डेटा लिमिट कमी करण्यात आली आहे. याआधी १५५ रुपयांच्या प्रीपेड रिचार्ज प्लानमध्ये ६ जीबी डेटा मिळत होता, मात्र, आता फक्त २ जीबी डेटा मिळतो. जिओनंतर आता एअरटेल कंपनीनेदेखील आपल्या रिचार्ज प्लानमध्ये वाढ केली आहे. रिचार्ज प्लान २० ते २७ टक्क्यांनी वाढले आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ठाकरे की शिंदे? धनुष्यबाण कोणाच्या हाती येणार? सुप्रीम कोर्टात आज काय घडलं?

मुंबई । नगर सहयाद्री:- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होताच, शिवसेना पक्षाच्या नावावरून...

साहेब! सांगा कचरा टाकू कुठे? ‘या’ भागातील महिलांचा सवाल, वाचा आयुक्त डांगे यांचे उत्तर..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर महानगरपालिकेच्या कचरा संकलन व्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाला असून शहरातील...

खळबळजनक आरोप: ‘आरएसएसच्या बैठकीत संभाजी ब्रिगेडला संपवण्याची योजना’

प्रवीण गायकवाड यांचा दीपक काटेला तुरुंगात सुविधा पुरवणार असल्याचा आरोप मुंबई । नगर सहयाद्री:- गेल्या...

नगरमधून अपहरण, आळंदीत अत्याचार; वारकरी शिक्षण संस्थेत चाललंय काय? महिला कीर्तनकारासह..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री पुण्याच्या आळंदी येथे धक्कादाय प्रकार उघडकीस आला असून अहिल्यानगर येथून...