spot_img
मनोरंजनअजून एक अभिनेत्री करणार देशाच्या राजकारणात एंट्री; चाहते म्हणतायेत..

अजून एक अभिनेत्री करणार देशाच्या राजकारणात एंट्री; चाहते म्हणतायेत..

spot_img

मुंबई – माणूस मोठा झाला कि त्याला राजकारणाचे वेध लागतात. असेच काहीसे सिने अभिनेते, अभिनेत्री यांच्याबाबत घडत आहे. हेमा मालिनी, जया प्रदा, जया बच्चन, स्मृती इराणी यांच्या पाठोपाठ आता अभिनेत्री अक्षरा सिंह राजकारणात एंट्री करणार असल्याचे बोलले जात आहे.

चित्रपटांत काम करून नाव आणि पैसा मिळविणार्‍या अनेक कलाकारांना राजकारणाचे प्रवेशद्वार खुणावतात. चिराग पासवान, किरन खेर, हेमा मालिनी, गोविंदा, परेश रावल, मुनमुन सेन, विनोद खन्ना, शत्रुघ्न सिन्हा, आधिकारी दीपक, बाबुल सुप्रीयो, भगवंत मान, जयाप्रदा, रवी किशन, जया बच्चन, स्मृती इराणी अशा कलाकारांनी लोकसभेपर्यंत मजल मारली. यात आणखी एका अभिनेत्रीचे नाव जोडले जाणार आहे.

यामध्ये भोजपुरी चित्रपटातील अक्षरा सिंह हिने राजकारणात प्रवेश कारणाचा निर्णय घेतला आहे. अक्षरा हिने प्रशांत किशोर यांची भेट घेतली. त्यामुळे चर्चांना अधिकच उधाण आले आहे. किशोर यांच्या जनसुराज अभियानात ती सामील झाली. आगामी लोकसभा निवडणुकीत ती जनसुराज पक्षाची उमेदवार असणार आहे. यामुळे चाहतेही विचारात पडले आहेत. अभिनेत्री अक्षरा सिंह हिने बिहारची राजधानी पाटणा येथील पक्ष कार्यालयात पक्षाचे सदस्यत्व घेतले.

काही दिवसांपूर्वी अक्षरा सिंह हिने आपण राजकारणात येणार नसल्याचे सांगितले होते. मात्र, त्यानंतर काही दिवसातच अक्षराने जनसुराज अभियानाचे सदस्यत्व घेतले. आगामी काळात होणारी लोकसभा निवडणुक ती लढविणार असल्याच्या चर्चा आहेत. अक्षरा कोणत्या मतदारसंघातून लढणार हे लवकरच स्पष्ट होईल.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ठाकरे बंधू एकत्र: आजच्या सभेतील सर्व मुद्दे एकाच क्लिकवर

मुंबई | नगर सह्याद्री महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षणात पहिलीपासून हिंदी शिकवण्या संदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द...

नगर शहरात मध्यरात्री अघोरी प्रकार? सीसीटीव्हीमध्ये हालचाली कैद, पहा काय घडलं?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहरातील बागडपट्टी येथे अघोरी विद्या, करणी व जादूटोण्याचा घडल्याचा...

शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट! वाचा, जिल्ह्यात कुठे किती पाऊस?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री- मे महिन्यात अहिल्यानगरमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. परंतु त्यानंतर मात्र...

सैफ अली खानला धक्का! सरकारचा मोठा निर्णय

मुंबई । नगर सहयाद्री:- सैफ अली खान याच्या भोपाळमधील पतौडी घराण्याची मालमत्ता उच्च न्यायालयानं...